- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
जव्हार प्रतिनिधी, राष्ट्रवादी व शिवसेनेच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश, जव्हार शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना पक्षांचे शेकडो कार्यकर्ते,पदाधिकारी आणि युवकांनी आज भाजपात जाहीर प्रवेश केला. हा भव्य प्रवेश सोहळा आ. हरिश्चंद्र भोये यांच्या उपस्थितीत आमदार कार्यालयात संपन्न झाला. नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश महत्त्वपूर्ण मानला जात आहे. युवक,महिला व उद्योजक यांच्या एकत्रित प्रवेशामुळे भाजपाचे संघटन बळकट झाले असून,यामुळे जव्हार नगरपरिषदेत गेली अनेक वर्षे असलेली राष्ट्रवादी व शिवसेनेची सत्ता डगमगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.गेल्या काही आठवड्यांपासून प्रत्येक प्रभागातील कार्यकर्ते भाजपात प्रवेश करत आहेत. ही एक नव्या राजकीय समीकरणाची सुरूवात असल्याचे सांगण्यात येत आहे.भाजपाच्या विचारधारेवर विश्वास ठेवत,विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित…
दिपक मोहिते, ” अभूतपूर्व घटना,” गृहकलह कधीही फायदेशीर ठरत नसते ; ठाकुरांनी देखील ठाकरे बंधूप्रमाणे विचार करावा, पाण्यात कितीही जोराने काठी मारली तरी पाणी वेगळे होत नाही.काही काळ तरंग उठतात,पण पुन्हा ते एकजीव होत असतात.तसंच कौटुंबिक नात्यात घडत असतं.आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनसेचे नेते राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीवर गेले होते.त्यांच्या या भेटीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी ” आज मला खूप आनंद झाला,” अशी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.त्यांच्या या भेटीमुळे राज्यात नवीन पर्वाला सुरुवात झाल्याचे मानण्यात येत आहे. ” हिंदी सक्ती,” च्या विषयावरून राज ठाकरे यांनी महिन्याभरापूर्वी उद्धव ठाकरे यांना टाळी दिल्यानंतर या दोघा…
दिपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात सध्या विदूषकांची कमी नाही… राज्यमंत्री मंडळातील काही उपद्व्यापी मंत्र्यामुळे सरकारची अब्रू दररोज वेशीवर टांगली जात आहे.मुख्यमंत्री या नात्याने देवेंद्र फडणवीस, या उपद्व्यापी मंत्र्यांना आवर घालण्याकामी प्रथमदर्शनी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळत आहे.श्रीकांत शिंदे यांच्या फाउंडेशनला सुमित फॅसिलिटीज,या बदनाम कंत्राटी कंपनीकडून देणग्या मिळाल्या संदर्भात सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या फाउंडेशनचा सर्वेसर्वा असलेला अमित साळुंखे,हा सध्या झारखंड राज्याच्या अँटीकरप्शन ब्युरोच्या कोठडीची हवा खात आहे.त्याच्यावर ६ हजार कोटी रु.चा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.हा अमित साळुंखे हा श्रीकांत शिंदे यांचा निकटवर्तीय असल्याचे सांगण्यात येत आहे.तर दुसरीकडे एकाच खात्याच्या दोन मंत्र्यामध्ये चांगलीच जुंपली आहे.राज्याचे कृषिमंत्री सध्या रमीमध्ये मग्न आहेत.संजय…
” दीपक मोहिते,” ” बॉटमलाईन,” ” कारगिल विजय दिन ; ” दक्षिण आशियात भारतच दादा,” दरवर्षी संपूर्ण भारतात ” कारगिल विजय दिन,” साजरा करण्यात येतो.युद्धविषयक असलेले सर्व आंतरराष्ट्रीय कायदे धाब्यावर बसवत पाकिस्तानच्या लष्कराने आपल्या भूभागात घुसखोरी करत आपला भूभाग ताब्यात घेतला होता.३ मे १९९९ रोजी पाक लष्कराने घुसखोरी केली होती.त्यांनी कारगिलमधील अनेक टेकड्यावर ताबा मिळवला.सुमारे ८५ दिवसाच्या लढाईनंतर भारताने आपला भुभाग पुन्हा ताब्यात घेतला व पाक घुसखोरांना यमसदनी धाडले. या युद्धात झालेल्या पराभवामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच निंदानालस्ती झाली.भारताच्या तोफखान्याच्या माऱ्यासमोर पाक सैन्याची अक्षरशः धुळदाण उडाली व भयभीत झालेले लष्करप्रमुख मुशरफ यांनी पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ याना युद्ध थांबवण्यासाठी साकडे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” नियती कोणाला सोडत नाही,आणि कोणाला अमरपट्टा देखील देत नाही,”… नियती,ही सर्वश्रेष्ठ असून ती कोणालाही सोडत नाही,वेळ आली की भल्याभल्याना ती दणका देत आली आहे.ती पृथ्वीवर जन्माला आलेल्या प्रत्येक सजीवाला ” येथेच कर,आणि येथेच भोग,” अशा न्यायाने वागवत आली आहे.पण तरीही माणूस आपल्या वागण्यात सुधारणा करत नाही,त्यांच्यामधील अहंकार त्यांना तसे करू देत नाही.माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड,हे हल्लीच्या काळातील नियतीचा दणका मिळाल्याचे उत्तम व ताजे उदाहरण आहे.आज त्यांची झालेली केविलवाणी परिस्थिती लक्षात घेऊन अहंकाराने पालथे पडणाऱ्या प्रत्येक राजकारणी व्यक्तीने धडा शिकवायला हवा. माजी उपराष्ट्पती जगदीप धनकड यांनी प.बंगालच्या राज्यपालपदी कार्यरत असताना संविधानाच्या साऱ्या मर्यादा ओलांडल्या होत्या. त्यांनी…
जव्हार प्रतिनिधी, सूर्या धरणामुळे संपर्क तुटलेल्या बेंडेपाडाला होडीचा आधार, पावसाळा सुरु झाला की बेंडेपाडा गावावर संकट येत असते. सूर्या धरण व धामणी ही दोन धरणे भरल्यावर गावाचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो.आजारी व्यक्ती, गर्भवती महिला,विद्यार्थी, वयोवृद्ध,असे सर्वच जण अडचणीत येत असतात.दरवर्षी येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीकडे अनेक वर्षे दुर्लक्ष झाले होते. यंदा मात्र तिलोंड्याचे माजी सरपंच परशुराम पाटारा यांचे सुपुत्र विजय पाटारा यांनी या प्रकरणात लक्ष घातले.त्यांनी थेट आ. हरिश्चंद्र भोये यांच्याशी संपर्क साधत या गंभीर परिस्थितीकडे त्यांचे लक्ष वेधले.गावकऱ्यांची अडचण ओळखून,आ.हरिश्चंद्र भोये यांनी तातडीने होडीसाठी आर्थिक निधी मंजूर केला.या मदतीमुळे आता बेंडेपाडा गावासाठी होडीची सुविधा उपलब्ध झाली आहे.त्यामुळे विद्यार्थी आता…
सुरेश काटे,तलासरी तलासरीत हॉटेल मालकांना मराठी पाट्या लावण्यासंदर्भात समज, मुंबई अहमदाबाद महामार्गांवर अनेक गुजराती – मारवाडी लोकांची हॉटेल्स असून या हॉटेल्सच्या मालकांनी आपल्या हॉटेलवरील पाट्या या गुजराती भाषेत लावल्या आहेत.महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना हॉटेलच्या पाट्या मराठीत लावण्याबाबत त्यांच्यामध्ये प्रचंड उदासीनता होती. या हॉटेल मालकांनी आपल्या हॉटेलच्या पाट्या मराठीत न लावल्यास खळखट्याकचा इशारा देण्यात आला होता. त्यामुळे शांतता व एकोपा राहण्यासाठी आज सकाळी या हॉटेल मालकांना तसेच तलासरीतील मनसे कार्यकर्त्यांना तलासरी पोलीस ठाण्यात करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी उभयतांमध्ये सामंजस्य घडवून आणले. सदर बैठकीमध्ये मनसे पदाधिकाऱ्यानी गुजराती पाट्या असलेल्या हॉटेल्सनी सात दिवसांमध्ये मराठी पाट्या लावाव्यात तसेच मेनू कार्डही मराठीमध्ये ठेवावेत.…
दीपक मोहिते, अजून वेळ गेलेली नाही… देवेंद्र फडणवीस व हितेंद्र ठाकूर यांनी लवकरात लवकर भाकरी फिरवायला हवी…. राज्य मंत्रिमंडळातील सात ते आठ बदनाम मंत्र्यामुळे राज्य सरकारची प्रतिमा मलिन होत असल्याच्या निर्णयाप्रत मुख्यमंत्री फडणवीस आले असून ते आता भाकरी फिरवण्याच्या तयारीत आहेत.तसे संकेत घटक पक्षाच्या प्रमुखांना त्यांनी दिले आहेत.राज्यातील जनतेच्या नाराजीचा फटका महायुतीला बसू नये,यासाठी फडणवीस यांनी आपल्या शर्टाच्या बाह्या वर करण्यास सुरुवात केली आहे.काही मंत्र्यांचा अतिरेकपणा सतत वाढत असल्यामुळे भाजपच्या आमदारांनीही मुख्यमंत्र्याकडे नाराजी व्यक्त केली आहे.त्यामुळे फडणवीस यांनी आता कारवाईचा बडगा उचलला आहे.त्यांना केंद्रीय नेत्यांकडूनही ग्रीन सिग्नल मिळाला आहे.त्यामुळे या सर्वांची गच्छंती अटळ आहे. भारतीय राजकारणात जनता ही बदनाम…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन, ” सरकारला सुचले शहाणपण, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती, ७/११ च्या मुंबई बॉम्बस्फ़ोट प्रकरणातील आरोपीना निर्दोष सुटका करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे.मात्र हे सर्व आरोपी सध्या तरी तुरुंगाबाहेरच राहणार आहेत. याप्रकरणी राज्य सरकारने दाखल केलेल्या फौजदारी अपिलावर काल सर्वोच्च न्यायालयाने मर्यादित प्रमाणात स्थगिती दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्या. अनिल किलोर व न्या.शाम चांडक यांच्या खंडपिठाने २१ जुलै रोजी रोजी सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत या १२ आरोपीना निर्दोष ठरवून त्यांची सुटका केली होती.सरकारी पक्ष आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करू शकला नाही.तसेच महाराष्ट्र एटीएसने तपासाच्या वेळी काही आरोपिंचा छळ केल्याचे निरीक्षण…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” सूडाच्या राजकारणामुळे राज्याची वाटचाल अराजकाच्या दिशेने… राज्याचे राजकारण सध्या मंत्र्यांचे बेलगाम वागणे, मराठी भाषेचे संवर्धन व संरक्षण,अशा दोन विषयाभोवती फिरत आहे.मंत्र्यांच्या मुजोरपणाला पायबंद बसायलाच हवा,याबद्दल दुमत नाही आणि मायबोली मराठी भाषेचा अपमान जर कोणी करत असेल तर त्याला मराठी माणसाचा हिसका कसा असतो,हे दाखवायलाच हवे.पण त्याचबरोबर राज्यात अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकल्या आहेत.त्या समस्यांना प्राधान्य मिळायला हवे.पण त्याकडे तथाकथित नेत्यांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.सत्ताधारी बेधुंद वागणे,राज्याच्या प्रगतीवर विपरीत परिणाम करणारे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या,रोजगार,ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद पडणे,विस्कळीत आरोग्य व वैद्यकीय सेवा,पायाभूत सोयी – सुविधांचा अभाव,वाढती महागाई,जीएसटीचा कहर, उद्योगधंदे वाढीचा मंदावलेला वेग,शेतमालाला योग्य…
