Author: दीपक मोहिते

अनंत साटम, कोकणातील ३०० गांवे पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल,यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी नुकतीच अधिसूचना प्रसिध्द केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुका- ४४,खेड – ८५, लांजा-५०,राजापूर- ५१ व संगमेश्वर तालुक्यातील ८१ अशी एकूण पाच तालुक्यातील ३११ गावे पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.या अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी जीवनावर परिणाम होणार आहे,अशा ग्रामस्थांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड,नवी दिल्ली यांच्याकडे आपला अभिप्राय नोंदवणे आवश्यक आहे. महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूर चे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पोलिसांनी निदान आता तरी वामन म्हात्रे यांच्यावर अटकेची कारवाई करावी, अखेर बदलापूरच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांच्यावर पोलिसांनी अँट्रोसिटी व महिला अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.महिला पत्रकारांशी असभ्य वर्तन करणाऱ्या वामन म्हात्रे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पोलीस टाळाटाळ करत होते.मात्र या प्रकरणी सदर महिला पत्रकाराने असभ्यपणे वागणाऱ्या वामन म्हात्रे याना धडा शिकवण्याचे ठरवल्यामुळे पोलीस पुन्हा अडचणीत आले होते. अखेर त्यानी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ७४,७९ व अनु.जाती व अनु.जमाती ( अत्याचार प्रतिबंधक कायदा १९८९ चे कलम ३ ( १ ) ( ब ) ( २ ) व कलम ३ ( २ )…

Read More

दीपक मोहिते, मुख्यमंत्री शिंदे यांचे ताळतंत्र सुटले, बदलापूर येथे घडलेल्या बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे बेताल व्यक्तव्य केले,त्यामुळे आता आगीत तेल ओतले गेले आहे.वास्तविक या संवेदनशील विषयावर बोलताना मुख्यमंत्र्यांनी या विषयाचे गांभीर्य लक्षात घ्यायला हवे होते.आपला एक सहकारी आंदोलकांवर बेफाम आरोप करत असताना त्यांनी आवर घालण्याऐवजी त्याची री ओढल्यामुळे आंदोलकामध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.ते काय म्हणाले ते पहा,” या आंदोलनात स्थानिक नागरिक हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच होते.अनेक आंदोलकांना बाहेरुन गाड्या भरून आणले होते,या सर्व घडामोडीमागे राजकीय प्रेरणा आहे,असा हास्यास्पद दावा केला. पीडित मुलीच्या पालकांना बदलापूर पोलीस बारा तास पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं,त्या मुलीच्या गरोदर आईच्या अंगात १०२ ताप…

Read More

दीपक मोहिते, भयावह वास्तव, मराठी पत्रकारितेच्या घसरणीला आपणच जबाबदार, ” जेफप्लस,” यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या या व्यंगचित्राने प्रसिद्धी माध्यमावर सध्या धुमाकूळ घातला आहे.एक गाढव कागदावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करत आहे,असे या व्यंगचित्रात दाखवण्या आले आहे.गाढवाच्या डोक्याऐवजी एक मानवी हात आहे,जो पेन धरून लिहीत आहे.हे व्यंगचित्र आजच्या मराठी पत्रकारितेची अवस्था कशी झाली आहे,यावर प्रकाश टाकते. आज मराठी पत्रकारितेत अर्धवट माहिती असलेल्या संपादक व पत्रकारांची संख्या सतत वाढत आहे.हे पत्रकार कोणत्याही विषयाची सखोल माहिती न घेता,अर्धवट तथ्य आणि वस्तुस्थितीवर आधारीत बातम्या देत नाहीत.त्यामुळे पत्रकारिता क्षेत्राची प्रतिष्ठा धुळीस मिळत आहे. पत्रकारितेचे ओळखपत्र घातल्याने कोणी पत्रकार होत नाही.संपादक व पत्रकार होण्यासाठी उत्तम लेखन कौशल्य…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, २४ ऑगस्ट रोजी ” महाराष्ट्र बंद,” बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी विरोधी पक्षाने आता महायुतीच्या सरकारला घेरण्यास सुरुवात केली आहे.येत्या शनि.२४ ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीने ” महाराष्ट्र बंद,” ची हाक दिली आहे.शाळेची संस्था भाजपशी संबधित असल्यामुळे पोलिसांनी दबावाखाली येऊन कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली असून महायुती सरकारने सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार गमावल्याचे माध्यमासमोर आज स्पष्ट केले. बदलापूर येथे झालेल्या बलात्कार प्रकरणी संस्थाचालक व पोलीस अधिकारी जबाबदार असल्याचे बदलापूरकरांचे म्हणणे आहे.त्यामुळे काल लोकांनी उत्स्फूर्त आंदोलन केले.या घटनेमुळे सरकार आता अडचणीत आल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या काही…

Read More

सुधाकर नेवरेकर, हाल – बेहाल, मराठवाड्यात भीषण पाणीटंचाई, मराठवाडा महसूल विभागात अद्याप पुरेसा पाऊस न झाल्यामुळे जालना व औरंगाबाद जिल्ह्यातील अनेक गावात पावसाळा सुरू असतानाही तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.जालना जिल्ह्यात सुमारे ४० गावात ७७ टँकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात येत आहे.गेल्या अनेक वर्षांपासून याभागातील नागरिकांना पाण्याअभावी अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मराठवाडा हा कायम दुष्काळी भाग असून अनेक जिल्हे दरवर्षी पाणीटंचाईमध्ये होरपळत असतात.त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यातील अनेक तालुक्याना टँकरचा आधार घ्यावा लागतो.जालना तालुक्यातील भोकरदन तालुक्यात गेल्या ऑक्टो.पासून सुरू झालेले पाण्याचे टँकर ऑगस्ट २०२४ संपत आला तरी सुरूच आहेत.या तालुक्यात असलेले जुई धरण अद्याप कोरडेठाक पडल्यामुळे एकूण ३२ गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” रामदास कदम यांचे ” हात दाखवून अवलक्षण,” मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेवरून शिवसेना ( एकनाथ शिंदे गट ) व सार्वजनिक बांधकाममंत्री रविंद्र चव्हाण या दोघामध्ये चांगलीच जुंपली आहे.रामदास कदम यांनी चव्हाण यांचा राजीनामा घ्या,अशी थेट मागणी केल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला असून युतीमध्ये असताना अशाप्रकारची टीका जाहीरपणे करणे योग्य नाही,अशी संतप्त प्रतिक्रिया दिली.तर रविंद्र चव्हाण यांनी तोंड सांभाळून बोला अन्यथा थोबाड फोडू,असा इशारा दिला आहे.गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या घटक पक्षात तू तू मै मै सुरू झाली आहे.अजित पवार यांना काळे झेंडे दाखवणे,मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांमध्ये कलगीतुरा रंगणे,यामुळे महायुतीची वाटचाल काट्याकुट्यानी भरलेल्या…

Read More

दीपक मोहिते, संपादकीय पानासाठी लेख, आमची मान शरमेने खाली गेली.. बदलापूर येथे घडलेल्या घटनेने महाराष्ट्राची मान शरमेने झुकली गेली.या घटनेमध्ये पोलिसांची भूमिका संशयास्पद असून त्यांनी गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्यामुळे बदलापूरकरांचा संताप अनावर झाला व जमाव बेकाबू होत गेला.जमावाचा आवेश बघून पोलीस व अन्य शासकीय यंत्रणा हतबल झाल्या होत्या.सकाळी नऊच्या सुमारास सुरू झालेले रेलरोको आंदोलन तब्बल सात ते आठ तास सुरू होते.जमाव इतका प्रक्षुब्ध झाला होता कि आरोपीला आमच्या ताब्यात द्या किंवा त्याला भररस्त्यात फाशी द्या, मागणी लावुन धरली होती.ही घटना घडल्यानंतर सुमारे सात दिवसांनी आंदोलन झाले,त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.काही राजकीय शक्तींनी एकत्र येऊन हे आंदोलन भडकवले,असा आरोप करण्यात…

Read More

दीपक मोहिते, भयावह स्थिती, निवडणूक पुढे ढकलणे ; ” आजचे मरण उद्यावर,” केंद्रीय निवडणूक आयोगाने झारखंड व महाराष्ट्र विधानसभा निवडणुका एक महिना पुढे ढकलल्या आहेत.वास्तविक या निवडणुकाही जम्मू-काश्मीर व हरियाणा या दोन राज्यासोबत होणे गरजेचे होते.पण केंद्र सरकारच्या दबावाखाली आयोगाने हा निर्णय घेतला आहे.या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भात आयोगाने जी कारणे सांगितली आहेत, ती हास्यास्पद तर आहेतच पण त्यांच्या स्वायतत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहेत. केंद्रीय निवडणुकीची गेल्या १० वर्षाची वाटचाल ही कायम वादाच्या भोवऱ्यात सापडली.त्यांची प्रत्येक कृती ही विशिष्ट पक्षाकडे झुकणारी राहिली.त्यामुळे या संस्थेची विश्वासार्हता धोक्यात आली आहे.१९९० पूर्वी निवडणूक आयोग हे काँग्रेसच्या कलेनुसार वागत होते.पण आयोगाच्या मुख्य आयुक्तपदी टी.एन.शेषन यांची…

Read More

दीपक मोहिते, सूर्यातीर, सरकारने आमच्या पाठीशी उभे राहावे,मच्छिमार समाजाची अपेक्षा, अडीच महिन्याच्या विश्रांतीनंतर उद्यापासून मासेमारीचा हंगाम पुन्हा सुरू होत आहे.त्यामुळे समुद्रकिनारी असलेल्या मच्छिमार गावांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.दरवर्षी १ जून ते नारळी पौर्णिमे दरम्यान सरकार सक्तीची बंदी लादत असते.पावसाळ्यात होणारी मासेमारी व्यवसायाला मारक तर असते.कारण हा कालावधी माश्याचा प्रजनन काळ असतो.तसेच समुद्रातील वादळी हवामान मच्छीमारांच्या जीवावर उठणारे असते.त्यामुळे सरकार दरवर्षी खोल समुद्रातील मासेमारीवर बंदी घालत असते.सरकारच्या या निर्णयाला मच्छिमार संघटनांचा एकमुखी पाठिंबा मिळतो,कारण या निर्णयामागे सरकारचा हेतू हा प्रामाणिक आहे. गेल्या काही वर्षात समुद्रात प्रदूषण,वादळी हवामान,अन्य राज्यातील मासेमारी बोटींचे आक्रमण,वाढते तेलक्षेत्र व भर समुद्रात प्रकल्प उभारणे,इ.कारणामुळे मत्स्यउत्पादनावर चांगलाच परिणाम होत गेला.…

Read More