- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- पालघर जिल्ह्यावर अनेक प्रकल्प लादून सरकार स्थानिकांना देशोधडीला लावत आहे,
- २०३४ पर्यंत भाजपचा पराभव करणे अशक्य,
- परिवहन सेवेचा संप ; ऐन सणासुदीच्या काळात नागरिकांचे प्रचंड हाल,
- वर्गात सर्वात सुंदर शिक्षक असतो,
- वसई विरार मनपा क्षेत्रात दीड दिवसाच्या गणपतीच्या मूर्तीचे उत्साहात विसर्जन,
- शेजारच्या देशात मोठ्या घडामोडी ; एक व दोन नव्हे तर सात राजकीय नेत्यांना मृत्यूदंड,
- ” या चिमण्यानो, परत फिरा रे, “
- पालघर हॉस्पिटल मारहाण प्रकरण ; २१ आरोपीना पोलीस कोठडी,
Author: दीपक मोहिते
सुशील भोईर, वसई, शिवछाया मित्रमंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७ वा वर्धापनदिन साजरा, नवयुगनगर,दिवाणमान,वसई पश्चिम येथे शिवछाया मित्र मंडळ व साईदयाघना मंदिराचा ३७ वा वर्धापन व साई उत्सव नुकताच विविध धार्मिक,सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने उत्साहात संपन्न झाला, १६ ते २३ जाने.दरम्यान श्री साईसच्चरित पारायण सप्ताह व सांयकाळी साईबाबांच्या पादुका व प्रतिमेची पालखी मिरवणूक साईबाबांचा देखावा,लेझीम पथक,धुर्म्रवर्ण ढोल पथक,बेंजो,जगदगुरू श्री नरेंद्र महाराज भजन मंडळ,सुंदर रांगोळ्या,गुलाब फुलांची पुष्पवृष्टी,रंगीबेरंगी फटाके आतषबाजी,पालखीचे मानकरी हरिलाल जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक,माणिकपूर पोलिस स्टेशन व प्रशांत लांगी,पोलिस निरीक्षक,वाहतूक शाखा,वसई परिमंडळ-२,संदेश जाधव व मंडळाचे पदाधिकारी,महिला साई भक्त पारंपरिक वेशभूषेत नाचत मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.दुसऱ्या दिवशी महिलांचा जल्लोष कार्यक्रमात,निवेदिका मोनिका यांनी…
अनिल वैद्य,नाशिक, अंमलीपदार्थ विक्री विरोधात कठोर कारवाई करावी – गृहराज्यमंत्री योगेश कदम, अंमली पदार्थ विक्रेत्यांबरोबरच सेवन करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई करतानाच याविरोधात शाळा, महाविद्यालयांमध्ये जनजागृती करावी.त्यामध्ये पालकांना सहभागी करून घ्यावे,असे निर्देश राज्याचे गृह ( शहरे ), महसूल,ग्रामविकास व पंचायतराज,अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण आणि अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी येथे दिले.ते आज नाशिक पोलिस आयुक्तालयात आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक,पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव,मोनिका राऊत,चंद्रकांत खांडवी यांच्यासह वरीष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री कदम म्हणाले की, अंमली पदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवावे.शहरात कुठेही अंमली पदार्थांची विक्री होणार नाही, याची दक्षता घ्यावी,अंमली पदार्थ…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” देशमुख कुटुंबियांना लवकर न्याय मिळेल,असे वाटत नाही…. गेल्या दोन महिन्यांपासून कराड पुराण सुरू असून महायुतीचे सरकार धनंजय मुंडे यांना पाठीशी घालत आहे,हे आता लपून राहिलेले नाही.संतोष देशमुख यांचे बंधू,कन्या व बीडवासीय न्याय मिळावा,यासाठी राज्यसरकारकडे सातत्याने मागणी करत आहेत,पण फडणवीस सरकारच्या हृदयाला पाझर फुटत नाही.दोन महिने उलटून गेल्यानंतरही हत्याप्रकरणातील प्रमुख आरोपी पोलिसांना सापडत नाहीत.त्यामुळे बीड जिल्हा पोलीस यंत्रणा संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा कट्टर समर्थक असून पोलिसांवर दबाव असल्यामुळे कराड याला सगळ्या सुविधा उपलब्ध होत आहेत,असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया केला आहे.मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा,यासाठी दमानिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष…
जव्हार प्रतिनिधी, जव्हार येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव पुरस्कार सोहळा उत्साहात साजरा, २६ जाने.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळा काळीधोंड येथे वार्षिक स्नेहसंमेलन व गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात श्री गणेश वंदनेने झाली.या सोहळ्यात एकूण ६० गाणे,नृत्य व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे नियोजन भाऊसाहेब शेटे,लक्ष्मी ठाकरे,नरसिंह सूर्यवंशी किरण कुवरा,सुनिता इंगळे,रुपेश घेगड,अर्जुन शिंदे,संजय कोकतरे,योगिता बोंबाडे,जयश्री भोये,निखिल महाले,पल्लवी बोरसे,मुक्ता कुरबुडे व पालकांनी केले.भाऊसाहेब शेटे आपल्या भाषणात म्हणाले,वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करत असून,त्यांच्या कला,कौशल्य आणि नेतृत्वगुणांना वाव देते.हे नेतृत्वगुण फक्त राजकीय क्षेत्रात नव्हे तर व्यावसायिक व शैक्षणिक क्षेत्रातही उपयुक्त ठरतात.कार्यक्रमाचे अध्यक्ष हरी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ४१ अनधिकृत इमारती ; लोकप्रतिनिधींकडून जुमलेबाजी सुरूच… नालासोपारा पूर्व भागातील ४१ अनधिकृत इमारतीवरील तोडक कारवाई जवळपास पूर्ण होत आली आहे.या कारवाईनंतर सुमारे दोनशे हुन अधिक कुटुंबाचे संसार उघड्यावर पडले आहेत.कारवाई सुरू होण्यापूर्वी आणि कारवाई सुरू झाल्यानंतरही खासदार व आमदाराकडून आश्वासनाची जुमलेबाजी सुरूच आहे.आज पुन्हा एक नवीन जुमला समोर आला आहे.आज या पीडित रहिवाशांना नवीन आश्वासन देण्यात आले आहे.याप्रकरणी खासदार आज देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.आज मंत्रीमंडळाची बैठक आहे,या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दिवसभर मुंबईत भरगच्च कार्यक्रम आहेत.त्यामुळे फडणवीस यांची भेट मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आणि समजा भेट मिळालीच तर याविषयी ते मुख्यमंत्र्यांना काय…
दिपक मोहिते, मानवी जीवनाला धोका, भूजलात नायट्रेटचे प्रमाण वाढले ; मानवी जीवनाला धोका, केंद्रीय भूजल मंडळाने नुकताच वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल जाहीर केला आहे.या अहवालात देशातील ४४० जिल्ह्यात भुजलात नायट्रेटचे प्रमाण धोकादायक पातळीपर्यंत वाढले असल्याचे नमूद केले आहे.यामध्ये महाराष्ट्रातील वर्धा,बुलढाणा,अमरावती,नांदेड,बीड,जळगाव व यवतमाळ या सात जिल्ह्याचा समावेश आहे.सदर अहवालाची राज्यसरकारने गंभीर दखल घ्यावी,अशी पर्यावरण तज्ञानी मागणी केली आहे. भुजलात नायट्रेटचे प्रमाण मर्यादेपेक्षा अधिक असणे,ही बाब गंभीर असून पर्यावरण व मानवी आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.नायट्रेट आधारीत रासायनिक खतांचा बेसुमार वापर,हे महत्वाचे कारण यामागे असून बागायती क्षेत्रात नायट्रेटचे प्रमाण अधिक असल्याचे या अहवालात म्हंटले आहे.पिण्याच्या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण वाढल्यास त्याचा परिणाम लहान…
अनिल वैद्य,नाशिक, सतीश आळेकर यांना जनस्थान २०२५ पुरस्कार जाहीर, नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा २०२५ सालचा जनस्थान पुरस्कार मराठी नाटककार अभिनेते आणि नाट्यदिग्दर्शक सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे आज या पुरस्काराची घोषणा झाली एक वर्ष आड दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे वितरण कविवर्य कुसुमाग्रजांच्या स्मृतीदिनी १० मार्च रोजी नाशिक येथे गुरुदक्षिणा हॉल येथे होणार आहे.एक लाख रु.रोख व सन्मान चिन्ह सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील रमणबाग न्यू इंग्लिश स्कूलमध्ये त्यांचे शिक्षण झाले.त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालयात झाले १९७२ साली त्यांनी पुणे विद्यापीठातून विज्ञानाची पदवी प्राप्त…
संगीता तावडे,मुंबई, फेब्रु.महिन्यात दोन दिवसीय ” मुंबई शहर ग्रंथोत्सव,” चे’ आयोजन, राज्यात वाचन संस्कृती जोपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ग्रंथोत्सव भरविण्यात येतो.मुंबई शहर जिल्ह्याचा ” मुंबई शहर ग्रंथोत्सव,” ५ व ६ फेब्रु. आयोजित करण्यात येणार आहे.मुंबई शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय,दादर यांच्या संयुक्त विद्यमाने या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.या ग्रंथोत्सवाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हा समन्वय समितीची बैठक दादर येथील मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या कार्यालयात झाली. सदर बैठकीला जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष प्रशांत पाटील,मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे प्रमुख कार्यवाह रविंद्र गावडे,कार्यवाह उमा नाबर,शिक्षण उपनिरीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी विजय सावंत,बृहन्मुंबई जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह सुनील कुबल…
दीपक मोहिते, उशीरा सुचलेले शहाणपण, गोड्या पाण्यातील मासेमारी ; राज्य सरकारकडून महत्वाचे पाऊल, काल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहात मत्स्यव्यवसाय विभागाच्या आगामी १०० दिवसाच्या नियोजनाचा आढावा घेतला.त्यांनी या आढावा बैठकीत गोड्या पाण्यातील मासेमारी संबधित विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये मत्स्यबीज उपलब्धता,व्यवसायाला प्रोत्साहन व आर्थिक निधी देणे,सागरी मासेमारी वाढीसाठी सर्वसमावेशक धोरण तयार करणे,धरण क्षेत्रातील मासेमारीला प्रोत्साहन देणे व मासेमारी सहकारी संस्थांचा कारभार पारदर्शक करणे,इ. महत्वाच्या विषयांचा समावेश होता. सरकारने राज्यातील मासेमारी व्यवसायासंदर्भात उचलेले हे महत्वाचे पाऊल असून भविष्यात सागरी मासेमारी व्यवसायासोबत गोड्या पाण्यातील मासेमारीलाही सुगीचे दिवस येतील,अशी अपेक्षा आहॆ.आपले राज्य व केंद्र सरकार कृषी क्षेत्रातील सुधारणाना जेवढे महत्व…
दीपक मोहिते, एसटी सेवा ; सर्वप्रथम वाचवा आणि मग भाडेवाढ करा, गरिबाची मर्सिडीझ अशी ओळख असलेल्या एसटीची १४.९५ टक्क्याने भाडेवाढ झाली आहे.एकीकडे महिला व वृद्ध प्रवाशांना मोफत प्रवास तर दुसरीकडे प्रचंड भाडेवाढ,सरकारचे हे धोरण सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे आहे.एसटी सेवा सक्षम होऊच नये,यासाठी आजवर अनेक प्रयत्न झाले.शासनाकर्त्यांच्या या प्रयत्नांना काही अंशी यशही आले.अनेक देशात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खाजगी वाहतूक व्यवस्थेच्या तुलनेत बळकट असावी,असे प्रयत्न केले जातात.पण आपल्या देशात नेमके उलटे होत आहे.त्यामुळे अनेक राज्यातील एसटी सेवा आज डळमळीत अवस्थेत असलेल्या पाहायला मिळतात.ही सेवा सक्षम होऊ नये,यासाठी राजकीय नेते,खाजगी सेवा देणारे ठेकेदार व सरकारी अधिकारी यांची अभद्र युती झाली आहे. राज्यसरकारने नुकतीच केलेली…
