- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, “हल्लाबोल,” महायुतीमध्ये उलट्याचे प्रमाण वाढत चालले, महायुती सरकारमधील मंत्री तानाजी सावंत यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार गट ) यांच्या विरोधात गरळ ओकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अंगाची लाही लाही झाली आहे.त्या पक्षाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी ” तानाजी सावंत जे काही बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे,” असा गर्भित इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजित पवार गट ) महायुतीमध्ये सध्या जमेनासे झाले आहे.लोकसभा निवडणुकीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व विश्व हिंदू परिषद,या दोन्ही संघटनांनी झालेल्या पराभवाचे खापर अजित पवार गटावर फोडले होते.संघाच्या मुखपत्रातून ( ऑर्गनायझर ) ” भाजपने अजित पवार गटाला सोबत घेतल्यामुळे महायुतीला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” खोटं बोल पण रेटून बोल, मालवण- राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा कोसळला,त्यामागची नेमकी कारणे काय आहेत,याचा शोध घेण्यासाठी राज्य सरकारने आता चौकशी समिती नेमली आहे.मात्र या समितीचा अहवाल राज्य सरकार सार्वजनिक करेल का ? याविषयी मात्र सर्वत्र साशंकता आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघानी मालवण समुद्रकिनारी ताशी ४५ कि.मी.वेगाने वारे वाहल्यामुळे हा पुतळा कोसळल्याचे जाहीरपणे निखालस खोटे बोलून वेळ मारून नेली होती.या दोघांची वक्तव्ये ही संतापजनक तर होतीच मराठी माणसाच्या मनावर खोलवर जखमा करणाऱ्या होत्या.चक्रीवादळ येण्यापूर्वी समुद्रकिनारी प्रचंड वेगाने वारे वाहत असतात.यावेळी चक्रीवादळही नव्हते.त्यामुळे ” कुछ तो गडबड आहे,”…
दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” विधानसभा निवडणुक ; सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळण्याची शक्यता, विधानसभा निवडणुका अद्याप जाहीर झाल्या नसल्या तरी अनेक चॅनेल्स,वृत्तपत्रे व निवडणूक सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी आतापासूनच आपले सर्व्हे जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.टाइम्स नाऊ व झी चॅनेलच्या सर्व्हेत त्यांनी महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त केला आहे.तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने केलेल्या खाजगी सर्व्हेमध्ये त्यांच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील,असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.त्यांच्या सर्व्हेची माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही,त्यांनी नमूद केलेल्या जागांपैकी ८५ % जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.आणखी एका संस्थेने केलेला सर्व्हे,हा त्यांच्या सर्व्हेशी मिळताजुळता आहे. त्या संस्थेचा सर्व्हे खालील प्रमाणे आहे:- १) भाजप-६५,…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, सहकार महर्षी पद्मश्री विठ्ठलराव एकनाथराव विखेपाटील यांची आज जयंती… २९ ऑगस्ट १९०१ अहमदनगर जिल्ह्यातील लोणी बुद्रुक (ता. श्रीरामपूर) या खेड्यात एका शेतकरी कुटुंबात विठ्ठलराव एकनाथ विखे-पाटील यांचा जन्म झाला.लोणी खुर्दच्या प्राथमिक शाळेत चौथीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले,नंतर त्यांनी लहान वयातच शेतीला सुरुवात केली.त्याकाळी शेतकऱ्यांच्या जमिनी कर्जबाजारीपणामुळे सावकारांच्या घशात गेल्यामुळे ते कंगाल बनले होते.सदर बाब नेमकी हेरून त्यांनी व व्यवहारबुद्धी,चातुर्य व काटकसरीने शेती केली. १९२३ मध्ये ” लोणी बुद्रुक सहकारी पतपेढी,” ची स्थापना करून ते सार्वजनिक जीवनातील सहकारी क्षेत्राकडे वळले. त्यांनी अवघ्या काही दिवसात जिल्ह्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले, तसेच गावातील पाथरवट-वडार मंडळींना एकत्र आणून ” मजूर सहकारी…
दिपक मोहिते, वाढवण बंदर भूमिपूजन ; विरोधात जिल्ह्यातील मच्छिमार संघटना एकवटल्या, बहुचर्चित वाढवण बंदराचे भूमिपूजन उद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.त्याविरोधात मच्छिमारांमध्ये नाराजी प्रचंड नाराजी असून या भूमिपूजनाला राज्यातील मच्छिमार संघटनांकडून विरोध होत आहे. तसा निर्णय उत्तन,भाईंदर,वाढवण येथे काल झालेल्या समितीच्या सभेत निर्णय घेण्यात आला आहे.वाढवण बंदरच्या उभारणीमुळे पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील ६४ हुन अधिक मच्छिमार गावांवर विपरीत परिणाम होणार आहे.या बंदरामुळे समुद्रातील मत्स्यउत्पादनात प्रचंड घट होईल व लाखो मच्छिमार आपला व्यवसाय कायमस्वरूपी गमावणार आहेत,असे या मच्छिमार संघटनांचे म्हणणे आहे. विकासाच्या नावाखाली मच्छिमारांना उध्वस्त करण्यात येत असेल तर ते कदापि सहन करणार नाही.असा इशारा या संघटनांनी दिला…
सूर्यातीर- दीपक मोहिते ” शिक्षणाच्या आयचा घो,”. माझ्या या लेखाचे हेडिंग वाचून तुम्हा सर्वाना आश्चर्याचा धक्का बसला असेल,साहजिकच आहे.पण आपल्या शिक्षण व्यवस्थेची सध्याची अवस्था लक्षात घेता,माझ्या या लेखासाठी हेच हेडिंग समर्पक असल्याचे वाटले आणि मी ते देवून टाकले. पुढे तुमच्या वाचनात येणाऱ्या या लेखात हे हेडिंग मी का दिले,याचा उलगडा तुम्हा वाचकांना होईल. गेल्या काही वर्षात आपल्या शिक्षण व्यवस्थेने कात टाकली आहे.कालानुरूप प्रत्येक क्षेत्रात बदल होत असतो,हा निसर्गाचा नियम आहे.व तो मानवी जीवनाशी निगडीत आहे.त्याच पार्श्वभूमीवर आपल्या शिक्षण व्यवस्थेतही अमुलाग्र बदल होत गेले.आमच्या काळातील प्रचलित शिक्षण व्यवस्था व सध्याची यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे.बालवाडी,बिगरी, ज्युनीयर-सीनियर के.जी,हे सर्व आता भूतकाळात जमा झाले…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीला परिणाम भोगावे लागतील, बदलापूर बलात्कार व मालवण-राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे,या दोन घटनांमुळे अवघा महाराष्ट्र हळहळला असून त्याचे पडसाद अद्याप उमटत आहेत.शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर काल सेना-भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा,त्याची निंदा करावी तेवढी थोडीच….या राड्याच्या वेळी जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक हे दोन अधिकारी अत्यंत बेजबाबदारपणे वागले.महाविकास आघाडीचे नेते मालवण मध्ये येणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर काही तरी गडबड होणार,हे लक्षात घेऊन त्यांनी घटनास्थळी मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवायला हवा होता.तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांना घटनास्थळी जाण्यासाठी दुसरी वेळ द्यायला हवी होती.पण या दोघांनी काहीही न करता केवळ बघ्याची भूमिका घेतली.जिल्हाधिकारी तर राडा सुरू झाल्याबरोबर गायब झाले.पोलीस अधीक्षक…
दीपक मोहिते, पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा काळवंडला.. सत्ताधाऱ्यांनी महाराष्ट्र नासवला, आज मालवण-राजकोट येथे घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे,विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार व विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,माजी खा.विनायक राऊत व जयंत पाटील मालवणात आले असता भाजपच्या समर्थकांनी जो गोंधळ घातला तो अत्यंत लाजिरवाणी असाच होता.यावेळी झालेल्या हाणामारीकडे पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.तर जिल्हाधिकारी अक्षरशः पळून गेले.पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतल्याचे पाहून आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. विरोधी पक्षाचे नेते पाहणीसाठी आले असता खा.नारायण राणे व माजी खा.निलेश राणे हे दोघेपण त्याठिकाणी आले.त्यांच्या सोबत भाजपचे कार्यकर्तेही दाखल झाले.भाजपच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी पोलिसांनी येऊ का दिले ? असा प्रश्न आता विचारण्यात…
दीपक मोहिते, महाराष्ट्राचे दुर्देव, आगामी विधानसभा निवडणुकीत नक्कीच ” वाईटातून चांगलं,” निर्माण होणार आहे.. दोन दिवसापूर्वी मालवण-राजकोट येथे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला.या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे,पण सत्ताधारी मंडळींना त्याचे बिलकुल सोयरसुतक नाही.आता केंद्र सरकारने राज्य सरकारला घरचा आहेर दिला आहे.पुतळ्याची जबाबदारी पार पाडण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा ठपका त्यांनी ठेवला आहे.तर राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुतळ्याच्या अवशेषांची पाहणी करून या पुतळ्याचे नटबोल्ट गंजलेले आहेत,असा धक्कादायक अहवाल दिला.या राज्यात कधी काहीही घडू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.या सर्व घडामोडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर काय म्हणतात ते पहा..मुख्यमंत्री म्हणाले,या समुद्रिकिनारी ४५…
दीपक मोहिते, सूर्यातीर-निवडणुक वार्तापत्र -२०२४, १३० पालघर विधानसभा मतदारसंघ अनु.ज. पालघर विधानसभा ; शिवसेना ( उबाठा ) पुन्हा वर्चस्व राखणार, पालघर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या पालघर मतदारसंघावर २००९ चा अपवाद वगळता एकसंघ शिवसेनेचा अभेद्य असा गड होता.मात्र २००९ च्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राजेंद्र गावित हे मतविभागणीचा फायदा मिळवून विजयी झाले होते.पण त्यानंतर मात्र गावित यांना ही जागा जिंकता आली नाही.२०१४ साली ही जागा शिवसेनेने पुन्हा खेचून घेतली.राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन आ.कृष्णा घोडा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देऊन येथे सेनेतर्फे निवडणूक लढवली व केवळ ५१५ मताधिक्याने ही जागा जिंकली.यावेळी झालेल्या अटीतटीच्या लढतीत कृष्णा घोडा यांना ४६ हजार १४२ तर तर राजेंद्र गावित…
