- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, जगावर तिसऱ्या जागतिक महायुद्धाचे ढग जमू लागले आहेत, इराण,पॅलेस्टाईन,लॅबेनॉन व हिजबुल्लाह – इस्त्रायल यांच्यामध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे जगावर तिसऱ्या जागतिक महायुद्धाचे ढग जमू लागले आहेत.१९१४ -१९१८ मध्ये पहिले तर १९३९ -१९४५ दरम्यान दुसरे महायुद्ध झाले,ही दोन्ही महायुद्धे अनुक्रमे चार व सहा,अशी एकूण अकरा वर्षे लढली गेली.या युद्धात अनेक देश बेचिराख झाली.लाखो नागरिक मृत्युमुखी पडले.त्यानंतर आता ८० वर्षाचा काळ लोटला असून आपण पुन्हा तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करू लागलो आहोत.मध्य पूर्वेत सुरू असलेल्या या रक्तरंजित लढाईमुळे जगावर भितीचे ढग जमू लागले आहेत. काल रात्री इराणने इस्त्रायलवर १८० क्षेपणास्त्रे डागल्यामुळे आता युद्धाला तोंड फुटले आहे.या हल्ल्यात एक शाळा व…
दीपक मोहिते, इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन, भाग क्र.१, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया…. ” विधानसभा निवडणुकीसाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवार गटामुळे भाजप धायकुतीला, गृहमंत्री अमित शहा हे राज्याचा दोन दिवसीय दौरा आटोपून दिल्लीला रवाना झाले आहेत.या दोन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यासोबत अनेक बैठका घेतल्या.महायुतीच्या घटक पक्षात निर्माण झालेला बेबनाव संपुष्टात आणण्यासाठी अमित शहा यांना वारंवार मुंबई गाठावी लागत आहे,हे आता लपून राहिलेले नाही. अजित पवार व एकनाथ शिंदे गटासंदर्भांत भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड नाराजी असून ती आगामी विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरेल,याची जाणीव अमित शहा याना झाली असून त्यांनी सध्या स्वतःला पॅचवर्कच्या कामाला वाहून घेतले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या तिघांविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिल्लीश्वरांच्या ध्यानी आले असून…
दीपक मोहिते, विचाराचे गळे काढणे गैर आहे, राज्याच्या शाय शिक्षणासाठी चंद्रपूर चढले एक स्कूल अदानी फडेशनकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आहे, त्यावरुन सध्या गदारोळ उठला आहे. राज्यसरने अनेक उद्योग, रियल इक्ट मार्केट,विमान,ठागराच्या,अदान अपघात घडत आहे,असे आता स्थानिक स्थानिक शालेय हस्तांतरित कारणे आहे. बघता बघता बघता बघायला घेतलेला हा योग्यच भाव.ग्रामीण अनेक स्कूल आर्थिक तसेच आणि ब्यासी डबाईला आले आहेत.अशा एका शिकवणीने स्कूल चालवण्याची किंवा फाउंडलाची विनंती केली, ते कसे करायचे? गेल्या वर्षभरात ग्रामीण भागातल्या ओएसच्या प्राथमिक शाळा एकामागोमाग पडल्या. तर अनेक परीक्षांच्या पुरेशा उदाहरणे प्रत्यक्षात वापरत आहेत, अशा नियमानुसार विरोधक ठरवत आहेत, काही लक्षात ठेवा, यावरून पोलिस जर न्यायाला धरून नाहीत,…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” लाडकी बहीण,गोमाता,गरबा कार्यक्रमात इतर धर्मियांना बंदी व आता व्होट जिहाद,या सरकारला झालंय तरी काय ? महायुतीच्या सरकारला आपण आगामी विधानसभा निवडणुका जिंकू शकणार नाही,हे जाणवू लागल्यामुळे सध्या ते नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत.” व्होट जिहाद,” हा त्याचाच एक भाग आहे.यापूर्वी लाडकी बहीण,नंतर गोमाता व आता हा नवीन फंडा त्यांनी बाजारात आणला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव हा ” व्होट जिहाद,” मुळे झाला,असा साक्षात्कार तब्बल चार महिन्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला व ते आता बेंबीच्या देठातून कोकलत सर्वत्र फिरू लागले आहेत.त्यांना आता गोमाता,गरबा समारंभात इतर धर्मियांना मज्जाव करणे,सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे,असे विविध उपदव्याप सुचू…
दीपक मोहिते, पालघर जिल्ह्यात मुरबे समुद्रकिनारी आणखी एक बंदर, डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर उभारणीचे सर्व अडथळे दूर झाल्यानंतर राज्य सरकारने आता पालघर तालुक्यातील मुरबे समुद्रकिनारी बहुउद्देशीय बंदर उभारण्याची तयारी चालवली आहे.काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बंदराला मंजुरी देण्यात आली आहे.हे बंदर उभारण्याकामी ४ हजार २५९ कोटी रु.खर्च होणार आहेत. काही वर्षांपूर्वी डहाणू तालुक्यातील वाढवण येथे महाकाय बंदर उभारणीच्या हालचाली जेएनपीटीनकडून सुरू झाल्या होत्या.त्याच सुमारास अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या मुरबे समुद्रकिनारी हे बहुद्देशीय बंदर उभारण्याचेही राज्य सरकारकडून सुरू झाले होते.पण वाढवण बंदराला स्थानिक भूमीपुत्रांनी कडाडून विरोध झाल्यामुळे हा प्रकल्प गेली अनेक वर्षे अडगळीत पडला होता.मात्र गेल्या वर्षी ३१ ऑक्टो.२०२३ रोजी…
दीपक मोहिते, आ.हितेंद्र ठाकूर वाढदिवस विशेष, लोकनेते आ.हितेंद्र ठाकूर ; लोकमान्यता असलेला अजातशत्रू, उद्या वसईचे आमदार लोकनेते यांचा वाढदिवस,कोरोना काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता त्यांचा हा वाढदिवस गेली अनेक वर्षे मोठ्या उत्साहात साजरा होत आला.उद्याही तो उत्साही व आनंदी वातावरणात साजरा होणार आहे.आपल्या या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देण्यासाठी सकाळपासून कार्यकर्ते,राजकीय नेते,मित्रमंडळी,ज्येष्ठ नागरिक,महिला, आबालवृद्ध व अधिकारीवर्ग यांच्या जुने विवा महाविद्यालयात रांगा लागतील.या दिवशी होणारी गर्दी नियंत्रित करताना त्यांच्या कार्यकर्त्यांची चांगलीच दमछाक होत असते.असे हे असामान्य नेतृत्व आता साठीच्या घरात पोहोचले आहे,पण उत्साह व इच्छाशक्ती आजही ” जैसे थे,” स्थितीतच आहे.लाखो लोकांचे आशीर्वाद व शुभेच्छाच्या शिदोरीवर त्यांनी आजवर यशस्वी वाटचाल केली.एकेकाळी आ.हितेंद्र…
दीपक मोहिते, भितीचे सावट, मोदी व शहा यांचे राज्याचे दौरे ; पराभवाच्या भितीतुन, महाविकास आघाडीला राज्यात मिळणारा प्रतिसाद व शरद पवार यांची रणनिती,लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे.या महिन्यात गृहमंत्री तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.आज मुंबईत दाखल झाल्यानंतर शहा हे आमदार,पक्षाचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहेत.भाजप व अजित पवार गटातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे या दोन्ही घटक पक्षात चिंतेचे वातावरण पसरले आहे.अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व एकेकाळी शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेले दिलीप वळसे पाटीलही आता शरद पवार गटाच्या मार्गावर असल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे.…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” नितीन गडकरी यांनी सरकारची पोल खोलली, काल केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे एका कार्यक्रमात केलेल्या भाषणात राज्याची आर्थिक स्थिती किती डबघाईला आली आहे,याचे विदारक चित्र राज्यासमोर आणले आहे.” लाडकी बहीण योजनेलाही पैसे द्यावे लागतात,” हे त्यांच्या भाषणातील एक वाक्य खूप काही सांगून गेले.त्यांनी आपल्या या वाक्यातून गुंतवणूकदारांना सरकारच्या भरवशांवर राहू नका,असा सल्ला दिल्यामुळे भविष्यात या सरकारने आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे,यांची कल्पना येते. ते एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून भाषण करताना पुढे म्हणाले,”अनुदानाच्या पैशांची आता शाश्वती उरलेली नाही,कारण लाडकी बहीण योजना…”, या त्यांच्या एका वाक्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये आयोजित…
दीपक मोहिते, कोकण समुद्रकिनारा विकासाचे अधिकार सिडकोकडे,पर्यावरणाचा सत्यानाश होणार, गेल्या मार्च महिन्यात राज्य सरकारने पालघर,रायगड,सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील सुमारे १ हजार ६३५ गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी नियोजनाचे संपूर्ण अधिकार सिडकोला देण्याचा निर्णय घेतला होता.त्याची अंमलबजावणी आगामी विधानसभा निवडणुकीनंतर करण्याचे संकेत मिळत आहेत.किनारा नियमन क्षेत्र,अभयारण्य,खार व पाणथळ जमिनी,कांदळवन इ.जैववैविध्याने समृद्ध असलेल्या विभागाचा विकास सिडको प्राधिकरणाच्या माध्यमातून करण्याचा घाट शासनाने घातला आहे. वसई व नवी मुंबई भागात स्थानिक भूमीपुत्राच्या टीकेचे धनी झालेल्या सिडकोने २०१० मध्ये वसई विरार उपप्रदेशात लोकांच्या विरोधामुळे आपला गाशा गुंडाळला होता.वरील दोन्ही विभागाचा विकास तर होऊ शकला नाही,पण नवी मुंबईमध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांनी खाडीलगत असलेल्या तसेच पाणथळ जमिनी बिल्डरांच्या…
