Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” राजकीय घडामोडी,” तिसरी आघाडी प्रयोग यशस्वी होणार नाही, आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जागावाटपावरून महायुती व महाविकास आघाडी मध्ये रणकंदन सुरू झाले आहे.या दोघांकडून कितीही दावे करण्यात येत असले तरी ५० ते ६० जागांवर हमरी-तुमरी सुरू झाली आहे.अशी स्थिती असताना आता तिसरी आघाडी या कुरुक्षेत्रात उतरण्याच्या तयारीत आहे.या आघाडीचे नेतृत्व तीन असंतुष्ट आत्मे करत आहेत.शेतकरी नेते राजू शेट्टी,दिव्यांगाचे नेते बचू कडू व मराठा समाजाचे नेते संभाजी राजे,यांनी एकत्र येऊन ही आघाडी स्थापन केली आहे.गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीने या तिघांना फारसे महत्व न दिल्यामुळे त्यांनी आता तिसरी आघाडीची निर्मिती केली आहे.हे तिघेही विशिष्ट क्षेत्रापुरते मर्यादित असल्यामुळे…

Read More

दीपक मोहिते, ” वास्तव,” स्थानिक भूमिपुत्रांचा मीठ व्यवसाय भूतकाळात जमा, एकेकाळी जगभरातील २० देशांना वार्षिक ७ मिलियन टन मीठ निर्यात करणारे आपल्या देशातील मीठ उत्पादक व्यवसायिक व कामगार सध्या उपेक्षित जीवन जगत आहेत.गेल्या २० वर्षात या व्यवसायावर अनेक संकटे कोसळली व हा व्यवसाय उतरणीला लागला.त्यामागे निसर्ग व मानवनिर्मित कारणे आहेत.या व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात स्थानिक भूमिपुत्र रोजगार मिळवत होते.अनेक कुटुंबाचा चरितार्थ चालत होता.पण कालांतराने सरकारने बहूराष्ट्रीय कंपन्यांना परवानग्या देण्याचा सपाटा सुरू केला व भूमिपुत्र या व्यवसायातून बाहेर फेकला गेला.तर या व्यवसायात रोजगार मिळवणारे मजूर पार देशोधडीला लागले. मीठ व्यवसाय हा प्रामुख्याने समुद्रकिनारी असलेल्या गावातील खारटन जमिनीवर केला जातो.भरतीच्या वेळी नजीकच्या खाडीत…

Read More

दीपक मोहिते, ” पंचनामा, अज पवार गटाला शरद पवार धक्का दिला “झटका,” ओबीसी नेता गळाला, अजित पवार गटाच्या ओबीसी सेलचे प्रदेश समन्वयक व प्रदेश सरचिटणीस ईश्वर बाळबुद्धे यांनी आज शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांचा हा प्रवेश अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. ओबीसी भगवान भगवान छगन भगवान बुद्धजबल पक्ष दोन दिवसापूर्वी भेटलेले बघितले त्यांचा निर्णय कानाना बीसी महानायक यांनी नियुक्त केला आहे. महायुतीच्या नगरसेवकांचा प्रचार करण्यात आला होता. त्यांच्या नेतृत्वाखालील गोल्फ येथे सेलचे भव्य प्रशिक्षण शिबीर पार पाडण्यात आले होते. ओबीसी महामंडळाचे अध्यक्ष तयार करण्यात आले होते, मात्र नियुक्तीचा आदेश निघाला होता. नाराज होते. नुकत्याच महामंडळावर नियुक्त्या करताना…

Read More

दीपक मोहिते, रात्र वैऱ्याची आहे… स्थानिक भूमीपुत्राच्या जमिनी लुटण्यासाठी धनदांडगे सरसावले, डहाणू-नाशिक रेल्वे,हा महत्वाकांक्षी प्रकल्प आता मार्गी लागला आहे.हा प्रकल्प गेली ४० वर्षे कसा रखडला ? त्याला राजकीय पक्ष व लोकप्रतिनिधी यांचा नाकर्तेपणा कसा जबाबदार आहे,व आता प्रकल्प मार्गी लागत असल्याचे पाहून या भागातील जमिनी खरेदी करण्यासाठी मड्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे नतद्रष्ट लोक कसे सरसावले आहेत,यावर प्रकाशझोत टाकणारा व राज्यकर्त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन टाकणारा लेख लवकरच आपल्या news27.in या वेब पोर्टलवर प्रकाशित करत आहे.वाढवण बंदर होणार असल्याची खात्री पटल्यानंतर अनेक धनदांडग्यांनी वरोर व वाढवण गावातील जमिनी मातीमोल भावाने गिळंकृत केल्या.त्याच धनदांडग्यांनी आपला मोर्चा आता डहाणू -नाशिक रेल्वे प्रकल्प परिसरातील…

Read More

दीपक मोहिते, फ्रंटलाईन, ” एक नेशन,एक इलेक्शन,” ; पंतप्रधान मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणे कठीणच, ” एक नेशन,एक इलेक्शन,” हे जे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आहे,ते प्रत्यक्षात उतरणे,अत्यंत जिकिरीचे आहे.मोदी यांना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागणार आहे.अनेक घटनातज्ञ व नामवंत विधीतज्ञानी या संकल्पनेच्या अमलबजावणीमध्ये अनेक अडथळे असून ते अडथळे सहजासहजी दूर करणे,सरकारला शक्य होणार नाही,अशा प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. माजी राष्ट्पती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या उच्चस्तरीय समितीने आपल्या अठराशे पानी अहवालामध्ये तीन महत्वाच्या शिफारशी केल्या आहेत.त्या शिफारशी मंत्रिमंडळाने जशाच्या तशा स्विकारल्या आहेत.मात्र त्या स्विकारताना मंत्रिमंडळाने या शिफारशींची अमलबजावणी व त्यामध्ये असलेले अडथळे,याविषयी विचार केला नसल्याचे दिसून…

Read More

दीपक मोहिते, विरार-चिखलडोंगरे येथे सबस्टेशनचे भुमीपूजन, मंत्रालयापासून ते जिल्हाधिकारी आणि ही सब स्टेशनची जागा मिळवण्यासाठी आ.हितेंद्र ठाकूर व आ.क्षितीज ठाकूर यांचे लोकप्रतिनिधी म्हणून महत्त्वाचे योगदान आहे. त्यांच्या प्रबळ पाठपुरावामुळेच हे सबस्टेशन साधारणपणे येत्या २ वर्षात पूर्ण करण्यात येईल,असे आश्वासन महापारेषणचे अधीक्षक अभियंता मोहन ननावरे यांनी कार्यक्रम प्रसंगी चिखल डोंगरे येथे झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमाला वसईचे आ. हितेंद्र ठाकूर,नालासोपाऱ्याचे आ. क्षितीज ठाकूर,माजी महापौर नारायण मानकर,माजी स्थायी समिती सभापती जितुभाई शहा,आजीव पाटील,प्रशांत राऊत,माजी नगराध्यक्षा कांता पाटील,माजी नगरसेवक रंजन पाटील,वामन पाटील,माजी सरपंच रामचंद्र मेहेर,गोवालीज औद्योगिक चे अशोक ग्रोव्हर,अशोक कुलास,किशोर शेट्टी ,महावितरण कंपनी चे मुख्य अभियंता महेश भागवत,अधीक्षक अभियंता मोहन ननावरे,कार्यकारी अभियंता योगेश पोलपांडे…

Read More

पालघर, फ्रंटलाईन, एक देश,एक निवडणूक ; शिफारशींना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी, ” एक देश,एक निवडणूक,” या प्रणालीला नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता त्यावर दोन्ही सभागृहात मंजुरी मिळावी,यासाठी भाजप प्रयत्नशील आहे.पण त्यांच्या या प्रयत्नांना प्रादेशिक पक्षाची साथ मिळेल,अशी शक्यता नाही.कारण ही प्रणाली प्रादेशिक पक्षाना मारक ठरणारी आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे इंडिया गटानेही यावर विचार करण्यासाठी आपल्या घटक पक्षाची बैठक बोलावली आहे. केंद्र सरकारने १०० दिवस पूर्ण झाल्यानंतर काल झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेतले.या बैठकीत ” एक देश,एक निवडणूक,” या महत्वाच्या विषयावर स्थापन करण्यात आलेल्या उच्चस्तरीय समितीच्या शिफारशी एकमताने स्विकारण्यात आल्या आहेत. निवडणुकीसाठी होणारा प्रचंड खर्च,वेळेचा…

Read More

दीपक मोहिते, सामाजिक भान, सरकारची अवस्था ; धरलं तर चावत आणि सोडलं तर पळते,” आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्य सरकारने गेल्या दोन वर्षात जाती-धर्म व समाजा-समाजात भांडणे लावली,आज हीच भांडणे महायुतीच्या चांगलीच अंगलट आली आहेत.मराठा-ओबीसी व धनगर-आदिवासी आता एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.जाती-धर्मात आग लावल्यानंतर ती आटोक्यात आणणे,कदापी शक्य होत नाही.त्यामुळे आज आरक्षणाच्या प्रश्नावरून तीन इंजिन सरकारची प्रचंड दमछाक होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अंतरवली सराटीमध्ये मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषणाचे हत्यार उपसले आहे.तर त्याच्याविरोधात ओबीसी समाजाच्या नेत्यांनीही याच गावात उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे.त्यामुळे अंतरवाली-सराटीमध्ये कायदा-सुव्यवस्थेची स्थिती बिघडण्याची शक्यता आहे.मराठ्यांना ओबीसींच्या आरक्षणातून आरक्षण देण्यात यावे,अशी मागणी जरांगे…

Read More

दीपक मोहिते, ” राजकीय डावपेच,” महामंडळाची खिरापत वाटून भाजपने डाव साधला, भाजपच्या चाणक्याने एका चेंडूमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचा नुकताच त्रिफळा उडवला आहे.शिंदे गटातील अनेकांना महामंडळाची लॉटरी लागली आहे.ज्यांना ही लॉटरी लागली आहे,त्यांना भाजपने विधानसभेसाठी असलेल्या इच्छुकांच्या भल्यामोठ्या रांगेतून आता बाहेर काढले आहे.तर अजित पवार गटाच्या तोंडालाही पाने पुसली आहेत.अशाप्रकारे अनेक इच्छुक उमेदवारांना आता उमेदवारी मागता येणार नाही.महामंडळाच्या खिरापती वाटण्यात आल्यामुळे भाजपने स्वतःचा मार्ग अत्यंत हुशारीने मोकळा करून घेतला आहे.अजित पवार व एकनाथ शिंदे या गटाच्या जागा स्वतःकडे खेचून घेण्यासाठी भाजपकडून आखण्यात आलेली रणनिती यशस्वी ठरली आहे.शिंदे गटाचे संजय शिरसाठ व भरत गोगावले हे मंत्रीपदासाठी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” ” आधीच मर्कट,त्यामध्ये दारू प्यायले,” काँग्रेस नेते खा.राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून महायुतीच्या लोकांनी राज्यात जो काही धुमाकूळ घातला,त्याचा निषेध करावा,तेवढा थोडाच म्हणावा लागेल.राहुल गांधी यांनी मुलाखतीमध्ये आपले जे मत मांडले,त्याचे भाजपच्या आयटी सेलने ” कट अँड पेस्ट,” निती वापरून क्लिप व्हायरल केली.त्यानंतर आ.संजय गायकवाड व खा.अनिल बोंडे,यांनी एकामागोमाग अकलेचे तारे तोडले.ज्यांचे ” वरचे मजले रिकामे,” आहेत,अशा या दोन महाभागांची राजकीय वाटचाल अतिशय वादग्रस्त आहे.त्यामुळे त्यांच्याकडून चांगल्याची अपेक्षा करणे,म्हणजे स्वतःचे डोके दगडावर आपटून घेण्यासारखे आहे. वास्तविक खा.राहुल गांधी यांनी मुलाखतीमध्ये मुलाखतकाराने विचारलेल्या प्रश्नाला अत्यंत अभ्यासपूर्ण व देशातील सामाजिक व्यवस्थेचे भान राखून उत्तर दिले…

Read More