- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- २५ जून १९७५ ; आणीबाणीच्या कटू आठवणीना उजाळा,
- ठाकूर यांचा संताप ; हार्दिक राऊत यांच्या पथ्यावर पडणार ?
- ठाकूरको आखिर गुस्सा क्यों आया ?
- देशात श्रीमंत – गरीब, दरी सतत रुंदावतेय ; आर्थिक व सामाजिक विषमता अत्यंत धोकादायक…
- यंदा मान्सूनने चांगलाच इंगा दाखवला…
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाग क्र.१, देश व राज्य कर्जाच्या खाईत, केंद्र व महाराष्ट्र सरकार कितीही बोंबलत असले तरी देश व आपले राज्य कर्जात अखंड बुडल्याचे विविध वित्तीय संस्थांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.देशावर सुमारे २०५ लाख कोटी रु.चा बोजा असून आंतरराष्ट्रीय नाणे निधीने केंद्र सरकारला कडक शब्दात इशारा दिला आहे.राज्याची आर्थिक स्थितीही पार डबघाईला आली असून राज्यावर असलेल्या कर्जाचा बोझा हे ८२ हजार कोटींवर गेला आहे.दहा वर्षांपूर्वी मोदी सरकार सत्तेत येण्यापूर्वी देशावर ५४ लाख कोटीचे कर्ज होते,ते आता २०५ लाख कोटीवर गेले आहे.कर्ज जर असंच वाढत गेलं तर ते जीडीपीपेक्षा अधिक होईल,असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे.त्यांनी दिलेल्या अहवालात देशाचे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अरे कुठे नेवून ठेवला आमचा महाराष्ट्र ? विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे राज्यातील जनतेला काय काय पाहावे लागणार आहे,देवजाणे ? कोण मंत्रालयाच्या सज्यातून उड्या मारतो,कोण गुलाबी जाकीट घालून फिरतोय,तर कोण दर दोन ते दिवसाने मोदी व शहा यांच्या विमानाची वाट बघत विमानतळावर ताटकळत उभे राहत आहेत.अरे काय चाललंय आमच्या मराठी मुलखात,कुठे नेवून ठेवला आहे,आमचा महाराष्ट्र ? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हा-आम्हाला कधीही मिळणार नाही.भले मग आमचा महाराष्ट्र कायदा – सुव्यवस्थेविषयी रसातळाला गेला तरी बेहत्तर… आज या राजकारण्यांनी केलेली आपल्या महाराष्ट्राची अवस्था पाहून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी आपले देह ठेवले ते हुतात्मा नक्कीच ढसाढसा रडत असतील.पण ही रडायची…
दीपक मोहिते, इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन, पालघर विधानसभा,( अनु.जमाती ) भाग क्र.३, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया….…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मराठी भाषेला अभिजात दर्जा ; केंद्र सरकारचे ” पूतना मावशीचे प्रेम,” आजवर झालेल्या हजारो लढाईत पराभवाची ज्याला भिती वाटली नाही,असा एकही योद्धा या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही. स्वतःला देवपुरुष व जगद्गुरू म्हणवणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील त्यास अपवाद ठरू शकलेले नाहीत.आगामी विधानसभा निवडणुकीत आपला पराभव अशा भिती मुळे ते व त्यांचे सहकारी अमित शहा,सध्या हवालदिल झाले आहेत.लाडकी बहीण योजना,वयोश्री योजना,अशा योजनांचा त्यांनी धुमधडाका लावला आहे,त्यासाठी ४३ हजार कोटी रु.ची उधळपट्टी ते करत आहेत.तरीही मतदार आपल्याला ठेंगा दाखवतील,असा अंदाज आल्यानंतर त्यांनी काल मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या या निर्णयाने मराठी भाषिक मतदार…
इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन, नालासोपारा विधानसभा,भाग क्र.२, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे,सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया…. ” ६ विधानसभा निवडणुकीसाठी मतदाराच्या…
दीपक मोहिते, जगावर तिसऱ्या जागतिक महायुद्धाचे ढग जमू लागले आहेत, इराण,पॅलेस्टाईन,लॅबेनॉन व हिजबुल्लाह – इस्त्रायल यांच्यामध्ये सुरू झालेल्या संघर्षामुळे जगावर तिसऱ्या जागतिक महायुद्धाचे ढग जमू लागले आहेत.१९१४ -१९१८ मध्ये पहिले तर १९३९ -१९४५ दरम्यान दुसरे महायुद्ध झाले,ही दोन्ही महायुद्धे अनुक्रमे चार व सहा,अशी एकूण अकरा वर्षे लढली गेली.या युद्धात अनेक देश बेचिराख झाली.लाखो नागरिक मृत्युमुखी पडले.त्यानंतर आता ८० वर्षाचा काळ लोटला असून आपण पुन्हा तिसऱ्या जागतिक महायुद्धाच्या दिशेने वाटचाल करू लागलो आहोत.मध्य पूर्वेत सुरू असलेल्या या रक्तरंजित लढाईमुळे जगावर भितीचे ढग जमू लागले आहेत. काल रात्री इराणने इस्त्रायलवर १८० क्षेपणास्त्रे डागल्यामुळे आता युद्धाला तोंड फुटले आहे.या हल्ल्यात एक शाळा व…
दीपक मोहिते, इच्छुक उमेदवारांच्या प्रगती पुस्तकाचे चावडी वाचन, भाग क्र.१, पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात विविध पक्षाकडे इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडेल,हे सांगणे सध्या तरी कठीण आहे.पण यांना उमेदवारी का मिळावी,त्यांचे कर्तृत्व किती ? त्यांना परिसर विकासकामाबाबत किती आस्था आहे ? त्यांनी आपल्या पक्षवाढीसाठी किती प्रयत्न केले ? या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या लेखातून करणार आहोत.गेल्या महिन्यात या सर्व इच्छुकांना आपण प्रश्नावली पाठवली होती,पण एकाही इच्छूकाला यातील प्रश्नांची उत्तरे देता आली नाहीत.त्यामुळे आता आपण स्वतःहून त्यांच्या या कामाचा आढावा आपल्या परीने घेतला आहे.सर्वप्रथम आपण जिल्ह्याच्या ज्वलंत प्रश्नावर एक नजर टाकूया…. ” विधानसभा निवडणुकीसाठी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अजित पवार गटामुळे भाजप धायकुतीला, गृहमंत्री अमित शहा हे राज्याचा दोन दिवसीय दौरा आटोपून दिल्लीला रवाना झाले आहेत.या दोन दिवसाच्या दौऱ्यात त्यांनी भाजप पदाधिकाऱ्यासोबत अनेक बैठका घेतल्या.महायुतीच्या घटक पक्षात निर्माण झालेला बेबनाव संपुष्टात आणण्यासाठी अमित शहा यांना वारंवार मुंबई गाठावी लागत आहे,हे आता लपून राहिलेले नाही. अजित पवार व एकनाथ शिंदे गटासंदर्भांत भाजप कार्यकर्त्यांमध्ये सध्या प्रचंड नाराजी असून ती आगामी विधानसभा निवडणुकीत त्रासदायक ठरेल,याची जाणीव अमित शहा याना झाली असून त्यांनी सध्या स्वतःला पॅचवर्कच्या कामाला वाहून घेतले आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस या तिघांविषयी महाराष्ट्राच्या जनतेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे दिल्लीश्वरांच्या ध्यानी आले असून…
दीपक मोहिते, विचाराचे गळे काढणे गैर आहे, राज्याच्या शाय शिक्षणासाठी चंद्रपूर चढले एक स्कूल अदानी फडेशनकडे सुपूर्त करण्याचा निर्णय आहे, त्यावरुन सध्या गदारोळ उठला आहे. राज्यसरने अनेक उद्योग, रियल इक्ट मार्केट,विमान,ठागराच्या,अदान अपघात घडत आहे,असे आता स्थानिक स्थानिक शालेय हस्तांतरित कारणे आहे. बघता बघता बघता बघायला घेतलेला हा योग्यच भाव.ग्रामीण अनेक स्कूल आर्थिक तसेच आणि ब्यासी डबाईला आले आहेत.अशा एका शिकवणीने स्कूल चालवण्याची किंवा फाउंडलाची विनंती केली, ते कसे करायचे? गेल्या वर्षभरात ग्रामीण भागातल्या ओएसच्या प्राथमिक शाळा एकामागोमाग पडल्या. तर अनेक परीक्षांच्या पुरेशा उदाहरणे प्रत्यक्षात वापरत आहेत, अशा नियमानुसार विरोधक ठरवत आहेत, काही लक्षात ठेवा, यावरून पोलिस जर न्यायाला धरून नाहीत,…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” लाडकी बहीण,गोमाता,गरबा कार्यक्रमात इतर धर्मियांना बंदी व आता व्होट जिहाद,या सरकारला झालंय तरी काय ? महायुतीच्या सरकारला आपण आगामी विधानसभा निवडणुका जिंकू शकणार नाही,हे जाणवू लागल्यामुळे सध्या ते नवनवीन हातखंडे वापरू लागले आहेत.” व्होट जिहाद,” हा त्याचाच एक भाग आहे.यापूर्वी लाडकी बहीण,नंतर गोमाता व आता हा नवीन फंडा त्यांनी बाजारात आणला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत आपला पराभव हा ” व्होट जिहाद,” मुळे झाला,असा साक्षात्कार तब्बल चार महिन्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झाला व ते आता बेंबीच्या देठातून कोकलत सर्वत्र फिरू लागले आहेत.त्यांना आता गोमाता,गरबा समारंभात इतर धर्मियांना मज्जाव करणे,सहभागी होणाऱ्या व्यक्तींचे आधारकार्ड तपासणे,असे विविध उपदव्याप सुचू…
