Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष, राज्याच्या निवडणुका कधी लागतील,याविषयी शिगेला पोहोचलेली उत्कंठा कदाचित आज सांयकाळी चार वाजता संपुष्टात येईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखाली १४ जणांचे पथक काल मुंबईत आले असून त्यांनी गेल्या दोन दिवसात अनेक विभाग व राजकीय पक्षांच्या नेत्यासोबत बैठका घेतल्या.या बैठकीतून त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. आज सांयकाळी चार वाजता त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे.महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका या १५ व १७ नोव्हें.अशा दोन दिवशी होतील,तर २० नोव्हें.ला मतमोजणी होईल,अशी शक्यता आहे. निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांशी विविध प्रश्नांवर संवाद साधला.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित…

Read More

दीपक मोहिते, शिवाजी महाराजांचा पुतळा ; चौकशी समितीच्या अहवालाने सरकारचे थोबाड फोडले, गेल्या २६ ऑगस्ट रोजी मालवण-राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला होता.घाईघाईने बांधण्यात आलेला हा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कसा काय पडतो व त्यामागची कारणे काय आहेत,याची चौकशी करणाऱ्या समितीचा अहवाल दोन दिवसापूर्वी राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे.ही समिती केंद्र सरकारने नियुक्त केली होती.यासमितीने दिलेल्या १६ पानी अहवालात नमूद करण्यात आलेली माहिती केवळ धक्कादायक नसून सत्ताधारी लोकांचा नालायकपणा सिद्ध करणारी आहे.पुतळा पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी कोणतीही माहिती न घेता ” या ठिकाणी ४५ कि.मी.वेगाने वारे वाहिल्यामुळे हा पुतळा पडल्याचे,” तोंड वर…

Read More

दीपक मोहिते, धोक्याची घंटा, युवासेनेचा विजय ; महायुतीसाठी धोक्याची घंटा, बहुचर्चित मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे निकाल काल लागले.या निवडणुकीत शिवसेना प्रणित ( उबाठा ) युवासेनेने भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा पार धुव्वा उडवला.या निवडणुकीत आपला पराभव होईल,अशा भितीमुळे महायुती सरकारने ही निवडणूक दोनदा पुढे ढकलली होती.पण प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मुंबई विद्यापीठाला ही निवडणूक अत्यंत घाईघाईने घ्यावी लागली.या निवडणुकीत शिवसेनेने भाजपचे चांगलेच कान उपटले आहेत.एकूण १० पैकी ९ जागा जिंकून सिनेटवर आपले निर्विवाद वर्चस्व असल्याचे दाखवून दिले आहे. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका या कोरोनानंतर सुमारे अडीच वर्षे रखडल्या होत्या.त्या २२ सप्टेंबर २०२४ रोजी घेण्याचे जाहीर करण्यात आले होते.पण अखेरच्या क्षणी…

Read More

दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” अमित शहा यांनी कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढवण्याऐवजी खच्चीकरण केले, गृहमंत्री अमित शहा यांनी विदर्भ,मराठवाडा व उ.महाराष्ट्र,या तीन विभागाचा नुकताच दौरा केला.या दौऱ्यात त्यांनी थेट स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.आजवर कधीही असं घडलं नव्हतं.त्यांनी या संवादातून कार्यकर्त्यांना प्राणवायू देण्याचा प्रयत्न केला.अचानकपणे अशाप्रकारची उपरती त्यांना का व्हावी ? या प्रश्नाचे उत्तर आहे,” लोकसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव,” होय.४८ पैकी ४५ जागा जिंकणार,असे दिवास्वप्न पाहणाऱ्या अमित शहा व नरेंद्र मोदी यांना १७ जागांवर समाधान मानावे लागले.हा अनुभव लक्षात घेऊन तसेच त्याची पुनरावृत्ती होऊ नये,यासाठी अमित शहा यांनी आता अशाप्रकारचे प्रयत्न सुरू केले आहेत.पण त्यांच्या या प्रयत्नाला कितपत यश…

Read More

दीपक मोहिते, ग्रामीण जनतेच्या हालअपेष्टा, साडेसात दशकानंतरही कृषीक्षेत्र आजही डगमगतच आहे, ग्रामीण भागातील शेतीला पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात सरकारचे दिशाहीन धोरण,हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारे ठरले आहे.आजवर अनेक अर्थतज्ञानी कृषी क्षेत्र हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असून तो मजबूत रहावा,यासाठी सरकारकडून असलेल्या अपेक्षा कधीच पूर्ण होऊ शकल्या नाहीत,सतत सांगत आले.पण सरकारने कृषी क्षेत्राच्या धोरणात कोणतेही बदल केले नाहीत.संयुक्त पुरोगामी व राष्ट्रीय लोकशाही आघाडी या दोन्ही सरकारच्या उदासिनतेमुळे आज देशाच्या कृषी क्षेत्राची पार वाताहत झाली आहे.किमान आधारभूत भाव ( एमएसपी ) वरून दोन वर्षांपूर्वी दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या भयानक आंदोलनानंतरही सरकारला शहाणपण आलेले दिसत नाही.त्यामुळे आता पुन्हा हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारण्याचे संकेत दिले…

Read More

दीपक मोहिते, ” न्यूजलाईन,” पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते एकूण १२ प्रकल्पाचे भुमीपूजन करणार आहेत.पण ज्या एस.पी.महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांची सभा होणार आहे,त्या मैदानावर प्रचंड चिखल झाल्यामुळे सभेची जागा बदलण्याची शक्यता आहे.निवडणूक आयोगाच्या पथकाचा आगामी विधानसभा निवडणुकीच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घाईघाईने या प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन उरकण्यात येत आहे.तसेच लवकरच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे मोदी व शहा या दोघांनी ” मिशन महाराष्ट्र,” हाती घेतले आहे.या अंतर्गत त्यांनी अनेक प्रकल्पाचा शुभारंभ करण्याचा सपाटा लावला आहे. अवघ्या दीड तासाच्या त्यांच्या या दौऱ्यात ते अत्यंत वेगाने १२ प्रकल्पाचे भूमिपूजन व तसेच उदघाटने पार…

Read More

दीपक मोहिते, निवडणूक अपडेट्स, राज्य विधानसभा निवडणूक ; येत्या  आठवड्याभरात निवडणुकीचे बिगुल वाजणार, महाराष्ट्र विधानसभा निवडणुक तयारीच्या हालचालींना चांगलाच वेग आला आहे.निवडणूक आयोगाचे राजीवकुमार हे आजपासून आपल्या पथकासह महाराष्ट्र दौरा करणार आहेत.या दौऱ्यादरम्यान निवडणूक आयोग राजकीय पक्ष व संबधित विभागाच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांसोबत ते बैठका घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांचा २६ ते २८ सप्टें.दरम्यान महाराष्ट्र दौरा आखण्यात आला आहे.या दौऱ्यात निवडणूक अधिकारी महाराष्ट्रातील निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतील. २६ सप्टें.रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाचे अधिकारी दिल्लीहून मुंबईकडे रवाना होत आहेत.त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे २७ सप्टें.रोजी सकाळी १०.०० वाजता निवडणूक मुख्य आयुक्त राजीवकुमार राज्यातील राजकीय पक्षांसोबत बैठक घेणार आहेत.त्यानंतर दुपारी १.००…

Read More

दीपक मोहिते, वरुणराजाची अवकृपा, अनेक जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिके धोक्यात, गेल्या तीन दिवसांपासून राज्यात होत असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनजीवन पार विस्कळीत झाले आहे.मुंबई,ठाणे,पालघर, रायगड,सोलापूर,नाशिक व इतर अनेक जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे.या अस्मानी संकटामुळे राज्यातील खरीप पीके धोक्यात आली आहेत.दरम्यान हवामान विभागाने सलग तीन दिवस अतिवृष्टी होईल,असा अंदाज व्यक्त केल्यामुळे शेतकऱ्यांचे धाबे दणाणले आहे.मुंबई व ठाणे सारख्या महानगरात सर्वत्र पाणी साचून राहिल्यामुळे कालपासून दैनंदिन व्यवहार ठप्प झाले आहेत.अनेक भागात रेल्वेरुळावरून पाणी वाहत आहे.त्यामुळे उपनगरीय सेवा देखील विस्कळीत झाली आहे.हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर केल्यानंतर राज्य शासनाच्या नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाने शैक्षणिक संस्था ( शाळा…

Read More

दीपक मोहिते, जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट ; आज शैक्षणिक संस्थाना सुट्टी जाहीर, प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहेत.त्या अधिकाराचा वापर करत पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महाविद्यालये,शाळा,अंगणवाड्या व इतर शैक्षणिक संस्था आज बंद ठेवण्याचे आदेश जारी केले आहेत.भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.गेल्या तीन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा,जिल्हा परिषद शाळा,नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा,सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली…

Read More

दीपक मोहीते, ” रणसंग्राम,” जागावाटपानंतर महायुतीमध्ये होणार उद्रेक, आगामी विधानसभा निवडणुकीत आपल्याला लोकसभा निवडणुकीसारखा फटका बसेल,अशा भितीतून गृहमंत्री अमित शहा यांचे राज्यात दौरे सुरू झाले आहेत.काल त्यांनी नागपूर येथे भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्याला हजेरी लावली होती.आज ते नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत.येत्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी,हे पुण्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानही या दोघांनी राज्यात सतत दौरे केले होते.पण त्या निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळू शकले नाही.ज्या विदर्भात भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी राहतात,त्या विदर्भात भाजपची प्रचंड पीछेहाट झाल्यामुळे शहा यांनी आता विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील राजकीय वातावरण महाविकास आघाडीला पोषक आहे,हे पाहून…

Read More