पालघर,
तानसा धरण भरले ; जिल्ह्यातील १५ गावांना सतर्कतेचा इशारा,
पालघर जिल्ह्यातील तानसा धरणाने पाण्याची कमाल पातळी गाठली असून ते ओसंडून वाहू लागले आहे.त्यामुळे वसई व वाडा तालुक्यातील एकूण १५ गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.वसई तालुक्यातील १२ तर वाडा तालुक्यातील ३ गांवाचा त्यामध्ये समावेश आहे.
गेल्या पंधरा दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे तानसा धरणातील पाण्याची पातळी १२८.१०७ मी.इतकी पोहोचली आहे.या धरणाची पूर्ण क्षमता १२८.६३ मी.इतकी आहे.सध्याची पातळी अधिक असल्यामुळे तसेच ती सतत वाढत असल्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जातील.त्यामुळे खानिवडे,घाटेघर,शिरवली,आडणे,पारोळ,आंबोडे, भाताणे,सायवन,काशीद-कोपर,हेदवडे,कोपर,चिमणे व वाडा तालुक्यातील निभावली,मेट व गोरांड या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.या धरणाचे दरवाजे उघडले की या सर्व गावात पाणी शिरते व हाहाकार उडतो.२००५ साली ही सर्व गांवे तब्बल तीन दिवस पाण्याखाली गेली होती.त्यावेळी प्रशासनाने नाविक दलाला पाचारण केले होते.या पार्श्वभूमीवर दरवर्षी अतिवृष्टी झाली की जिल्हा प्रशासन व आपत्कालीन यंत्रणा या सर्व गावावर विशेष लक्ष ठेवत असतात.जिल्ह्यातील धामणी व कवडास ही धरणे देखील येत्या आठ दिवसात ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.धरण क्षेत्रात प्रचंड पाऊस पडत असल्यामुळे यंदा जिल्ह्यातील सर्व धरणे व बंधारे अल्पावधीत पूर्णपणे भरतील,अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Trending
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
- ममता बॅनर्जी यांचा उद्धव ठाकरे होणार…
- अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली,
- वेळीच सावध व्हा, अन्यथा विनाश अटळ,
- अन्यायाविरोधात तरुणांनी पेटून उठायला हवे,
- चबाहर बंदर व टॅरिफ ; भारताचे परराष्ट्र धोरण चांगलेच अंगलट,
- रविंद्र फाटक यांना वसईत पैकीच्या पैकी मतदान होऊ शकते ,
- महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करण्याचे संकेत मिळत आहेत,

