वसंत भोईर,वाडा
वाड्यात महाविकास आघाडीतर्फे संतप्त निदर्शने,
पाकिस्तानला जशास तसे उत्तर द्या
जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांवर दहशतवाद्यानी हल्ला करून ठार मारले.या घटनेचे देशभरात त्याचे पडसाद उमटले.
या घटनेत महाराष्ट्रातील सहा पर्यटकांनी आपला जीव गमवला असून या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीतर्फे वाडा शहरात जोरदार निदर्शने करण्यात आली.यावेळी निदर्शकांनी पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी केली.
या निषेध आंदोलनात काँग्रेसचे पालघर जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल पाटील,तालुकाध्यक्ष दिलीप पाटील,शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख निलेश गंधे,तालुकाप्रमुख निलेश पाटील,वाडा नगरपंचायतीच्या माजी नगराध्यक्ष गितांजली कोळेकर,भरत गायकवाड,जनार्दन भेरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद पाटील, गणेश पाटील आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.या हल्ल्याचा बदला घ्या,अशी मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आली.
Trending
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…

