- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मतदार,सरकारच्या भुलभुलैय्यात अडकणार नाहीत, राज्यात तीन इंजिनचे सरकार,सध्या पैश्याच्या खिरापती वाटण्यात मश्गुल असून,त्यांच्या या अशा वागण्याचा राज्याच्या तिजोरीवर किती भार पडत याच्याशी त्यांना कसलेही देणेघेणे नाही.आज या सत्तेसाठी बेफाम झालेल्या सरकारने राज्याची तिजोरी रिकामी करण्याचे पाप केले आहे.कोणत्याही परिस्थितीमध्ये आगामी विधानसभा जिंकण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी अशी उधळपट्टी सुरू केली आहे.त्यांच्या या अशा वागण्यामुळे राज्याची विविध क्षेत्रात पीछेहाट सुरू झाली आहे.त्यामुळे राज्याची जनता त्यांना माफ करणार नाही.राज्यात विविध विकासकामे करणाऱ्या ठेकेदारांची हजारो कोटींची बिले गेल्या सहा महिन्यांपासून रखडली असून ठेकेदारांनी नवीन कामे सुरू करण्यास साफ नकार दिला आहे.तसेच त्यांच्या संघटनांनी आमची बिले मिळाली नाहीतर आंदोलन करण्याचा…
दीपक मोहिते, परतीचा पाऊस, परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले, काल रात्रीपासून राज्याच्या अनेक जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.१५ दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमन करणाऱ्या पावसामुळे राज्यातील अनेक पिके धोक्यात आली आहेत.तर शेतकरीवर्ग चिंतेत सापडला आहे.दरम्यान हवामान विभागाने उद्या ऑरेंज व परवा रेड अलर्ट जाहीर केला आहे.हा परतीचा पाऊस असून तो यंदाही शेतीला फटका देणारा ठरणार आहे,अशा प्रतिक्रिया ग्रामीण भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत. गेल्या काही वर्षापासून राज्यात पर्जन्यमानाचे प्रमाण सातत्याने कमी होत आहे.पावसाचे आगमन उशीराने होणे,मध्येच पावसाचे गायब होणे व शेती बहरल्यानंतर जाता जाता पिकांना फटका देणे,असे प्रकार गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.मात्र यंदा पावसाचे आगमन वेळेवर झाले,त्यामुळे…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” महायुतीमधून अजित पवार गटाला बाहेर काढण्याचे षडयंत्र, गेल्या दोन ते तीन दिवसात दिल्लीत घडलेल्या वेगवान घडामोडीमुळे महायुतीमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे.भाजपच्या वरिष्ठ नेत्यानी आपल्या मनातले जागावाटप राज्यस्तरीय नेत्यांच्या मुखातून बोलायला सुरुवात केली आहे.त्यामुळे शिंदे व अजित पवार गट सावध झाले आहेत.भाजपच्या मनातले जागावाटप कसे आहे ? व हे दोन्ही गट का धास्तावले आहेत ? व या दोन्ही गटाचे या जागावाटपावर काय म्हणणे आहे ? या तीन प्रश्नाचे उत्तर शोधायचा आपण प्रयत्न करूया. भाजपच्या दिल्लीश्वराच्या मनातील जागावाटप- १) भाजप-१६०, यापैकी १२५ जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचे राज्यस्तरीय भाजप नेत्याना टार्गेट, २) शिवसेना ( एकनाथ शिंदे गट )…
दीपक मोहिते, बदलापूर लैगिंक अत्याचार ; आरोपी अक्षय शिंदे पोलीसांच्या गोळीबारात ठार, विरोधकांकडून संशय व्यक्त, बदलापूरच्या शाळेत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ठार झाला. त्याने पोलिसांची बंदूक हिसकावल्याने पोलिसांनी अक्षय शिंदेचा एनकाऊंटर केल्याची माहिती समोर आली आहे. बदलापुर घटनेतील आरोपी अक्षय शिंदे याने पोलीसांवरही गोळीबार केल्याची माहिती आहे.तळोजा कारागृहातून साडेपाच वाजता पोलीस त्याला घेऊन बदलापूरला जात असताना ही घटना घडली.त्यानंतर पोलिसांनी कळवा रुग्णालयात दाखल केले.तेथे त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांची बंदूक हिसकावुन अक्षयने व्हॅनमध्येच पोलिसांवर गोळीबार केला. एकूण तीन राऊंड फायर केलं.पोलिसांच्या पायांवर गोळीबार झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी त्याच्यावर गोळीबार केला. या घटनेत…
दीपक मोहिते, बदलापूर लैगिंक अत्याचार; शांती सेना पोलिस गोळीबारात ठार शंका व्यक्त करतात, बदलापूरच्या घडलेल्या घडामोडींमध्ये उर्जा शक्तीने गोळीबारात थार मारली. त्याची पोलिसांची सत्ता आली हिरावून अक्षय शक्तीचा घटना एनसकावल्याची माहिती आहे. बदलापुरातील सक्रियतेने अक्षय शक्तीने पोलिसही गोळीबारची माहिती आहे. पोलिसांची बंदूक हिसकावुन अक्षयने व्हॅन्सनीच पोलिसांचा गोळीबार केला. एकूण तीन राऊंड फायर पॉवर्स. पोलिस राऊंडाच्या पायथ्याशी साध्या उभारणीसाठी स्वसंरक्षणार्थ त्याच्यावर गोबार केला. या शक्तीवान ऊर्जाचा वापर करून तयार करण्याची माहिती आहे. पोलीस फक्त अजून काही माहिती दिली नाही. सत्ताने पॅनेल अल्पवयीन स्त्री शोषण करण्याचा प्रश्न होता. दरम्यान,अक्षाचा एन्काऊंटर बेंजयचा खुलासानी केला आहे. अक्षयने स्वत::वर गोळी झाडली की आणखी काही दुसरं…
दीपक मोहिते, मराठा समाजाच्या आरक्षणाचा ४२ वर्षाचा खडतर प्रवास, मराठा आरक्षणावरून राज्याचे राजकारण सध्या ढवळून निघाले आहे.मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे.आज त्यांच्या उपोषणाचा सातवा दिवस असून त्यांची प्रकृती खूप खालावली आहे.या दरम्यान ओबीसी समाजाच्या नेत्यांनीही त्यांच्या बाजूच्या परिसरात आपले उपोषण सुरू केल्यामुळे अंतरवली सराटी वडगोद्री या दोन गावांत सध्या तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.गेली पाच दशके मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत पडला आहे.४५ वर्षांपूर्वी मराठा समाजाला आरक्षण मिळावे,अशी मागणी माथाडी कामगारांचे नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांनी केली,त्यानंतर २२ मार्च १९८२ रोजी मुंबईत त्यांनी विशाल मोर्चा काढला.तत्कालीन मुख्यमंत्री स्व.बाबासाहेब भोसले यांनी त्यांची ही मागणी मान्य केली.मात्र…
दीपक मोहिते, जलसंकटाचा धोका वेळीच ओळखा, यंदा वरुणराजाने आपल्यावर कृपा केली असली तरी राज्याच्या अनेक जिल्ह्यात दुष्काळ निर्माण झाला आहे.,मराठवाडा विभागात अनेक गावातील लोकांची पाण्यासाठी होणारी वणवण अद्याप थांबलेली नाही.राज्याच्या सर्व धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाली असली तरी येणारा उन्हाळा हा ग्रामीण भागातील जनतेसाठी तापदायक ठरणार आहे.राज्यात एकूण २ हजार ९९४ लहानमोठी धरणे आहेत,या धरणामध्ये सरासरी ६३ % पाणीसाठा आहे.गेल्या वर्षी हा साठा ६८ % इतका होता.मराठवाड्याच्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा ४८ % वर आल्यामुळे पुढच्या वर्षी मार्च ते जून असे चार महिने मराठवाडावासियावर तीव्र पाणीटंचाईचे अस्मानी संकट कोसळणार आहे.मात्र आपले सरकार या दुष्काळाचा सामना करण्यासंदर्भात फारसे संवेदनशील नसल्याचे दिसून येत…
दीपक मोहिते, भयावह वास्तव, शहरी भागातील रेल्वेसेवा सुधारणा करण्यावर भर देण्याची गरज, २०१४ साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत विराजमान झाल्यानंतर गेल्या १० वर्षात भारतीय रेल्वेला सुगीचे दिवस आले.१९४७ ते २०१४ सलग ६७ वर्षे रेल्वे सुधारणेला या पूर्वीच्या सरकारांनी कधीही प्राधान्य दिले नाही.विशेष करून मुंबईकर हालअपेष्टा सहन करत रेल्वेप्रवास करत होते.कोट्यवधी मुंबईकर चाकरमानी दररोज मरणयातना भोगत प्रवास करत राहिले.आजही त्यामध्ये फारसे बदल झालेले नाहीत.मोदी यांच्या सरकारने गेल्या दहा वर्षात रेल्वेच्या आधुनिकीकरणाला गती दिली.शहरी भागात मेट्रोचे जाळे विणले,रेल्वेस्थानके अद्ययावत केली,गाड्याचे रुपडे बदलले.अनेक शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी त्यांनी नवे मार्ग सुरू केले.आता त्यांनी पाहिलेले बुलेट ट्रेनचे स्वप्न प्रत्यक्षात उतरणार आहे.हे सारं घडत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” शरद पवार यांच्या पक्षात इनकमिंगला वेग, महायुतीचे नेते एकीकडे विविध योजनेच्या माध्यमातून पैश्याची खिरापत वाटत असताना दुसरीकडे शरद पवार यांनी त्यांच्या पायाखालची चादर ओढण्यास सुरुवात केली आहे.दोन दिवसांपूर्वी लिहिलेल्या लेखात महायुतीचे अनेक नेते शरद पवार यांच्या ” सिल्व्हर ओक,” या निवासस्थानी प्रवेशासाठी रांगेत उभे असल्याचे म्हंटले होते.आज त्या नेत्यांची यादी आमच्या हाती लागली आहे.पण शरद पवार हे प्रवेश देताना आता ताक देखील फुंकून पीत आहेत.या रांगेत कोण कोण उभे आहेत,यावर एक नजर टाकूया… १) विवेक कोल्हे-कोपरगाव, २) बाळ भेंगडे-मावळ, ३) बाबू पठारे-वडगाव शेरी, ४) हर्षवर्धन पाटील-इंदापूर, ५) मदन भोसले-वाई, ६) प्रशांत परिचारक-पंढरपूर ७) राजन पाटील-मोहोळ, ८)…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” राज्यात सरकार असून नसल्यासारखे, जातीपाती व धर्माचे राजकरण करणाऱ्या महायुतीच्या नेत्याना त्याच्या या दळभद्री राजकारणाने आता चांगलेच अडचणीत आणले आहे.मराठा विरुद्ध ओबीसी व आदिवासी विरुद्ध धनगर,या समाजामध्ये भिंती उभारण्याचे काम,ज्या नेत्यानी केले त्यांना लोकसभा निवडणुकीत विशिष्ट समाजाने चांगलाच हिसका दाखवला होता.त्या दणक्यानंतर तरी हे दळभद्री राजकारणी आपल्या वागण्यात सुधारणा करतील,अशी अपेक्षा होती.पण अंतरवली सिराट व वडगोद्री या गावात तसेच धारावी मुंबई येथे जे काही चालले आहे,ते दंगलीना आमंत्रण देण्यासारखे आहे.राज्याचे गृहमंत्री विविध वृत्तवाहिनीवर केवळ फुकटचे सल्ले देत असताना पाहायला मिळतात.वास्तविक रस्ते बंद करणे,दगडफेक करणे,असे प्रकार करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करणे गरजेचे आहे.पण गृहखात्याने त्यांना तमाशाई बनवून…
