- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- सेनेच्या ऐन वर्धापनदिनाच्या तोंडावर सहा खासदारांनी केला ” जय महाराष्ट्र, “
- तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू कोट्याच्या माळा,
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, धावपळीच्या या जगात मनसोक्त जगून घ्या, क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि. कधी विकेट जाईल,याची काहीच शाश्वती नसते कोणालाही… आयुष्य जाते ते रुसण्या फुगण्यात, अबोला धरण्यात,बऱ्याचदा आधी कोणी बोलावे,या अहंकारात वर्षानुवर्षे निघून जातात.जीवनाच्या वाटचालीत कोणीच कोणाचा कायमचा साथीदार नसतो मित्रानो. आज आहे तर उद्या नाही. शेवटी फक्त आपले स्थान केवळ फोटोफ्रेममध्येच असते.ती फोटोफ्रेम पाहून लोक आपल्या आठवणी जागवत असतात.जगून घ्या,बोलून घ्या,मनमुराद हसून घ्या,आलंच रडायला तर रडूनही घ्या.आपल्यावर कोणी रुसले असेल तर स्वतः त्याच्याशी बोला. प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे.वय,नोकरी, व्यवसाय,प्रतिष्ठा,जात-पात, धर्म यापलीकडे जाऊन जगता आल पाहिजे. नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या.लहानपणी वाटत मोठ व्हावं,मोठेपणी वाटत श्रीमंत व्हावं…
दिपक मोहिते, वाडवळ समाज ; स्वतःच्या कष्टाने आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला, पालघर जिल्ह्याच्या पश्चिम किनारपट्टीवर राहणारा सोमवंशी क्षत्रिय समाज म्हणजेच ” वाडवळ,” समाज होय.हा समाज महाराष्टाच्या पश्चिम किनारपट्टीवर वसई तालुक्याच्या दक्षिण सीमेपासुन डहाणू तालुक्याच्या उत्तर सीमेपर्यंत असलेल्या लांबलचक पट्ट्यात प्रामुख्याने वसला आहे.पुढे तो मुंबई पार करून रायगड तालुक्यात अलिबाग ते मुरूडपर्यंत विखुरला गेला.पारंपारिक पद्धतीने शेती व बागायती करुन सोमवंशीय क्षत्रिय समाज स्वत:चे अस्तित्व टिकवून राहिला.त्या काळातही सोमवंशीय क्षत्रिय समाजाचे काही विशिष्ट कुलाचार व गोत्रप्रवरे होते,वज्रेश्वरी,महालक्ष्मी,एकवीरा,शितलादेवी,महिकावती,इ.कुलदेवता होत्या.मुळचे क्षत्रिय असल्याने विवाहासारख्या प्रसंगी वापरण्यासाठी प्रतिकात्मक असा सिंहासनाचा मान सोमवंशीय क्षत्रिय समाजाला मिळाला होता.त्या सिंहासनावर पाच कलश असत म्हणून हा समाज ” पाचकळशी,” म्हणून ओळखला…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” पालघर विधानसभा ; भाजपमुळे शिंदे गटांच्या नेत्यांचे भवितव्य टांगणीला, दोन वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे गटात गेलेल्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा वैदेही वाढाण आता घरवापसीच्या मार्गावर आहेत.पण उद्धव ठाकरे त्यांना पक्षात पुन्हा घेतील,असे वाटत नाही. गेली अनेक वर्षे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कट्टर समर्थक म्हणून त्या ओळखल्या जात होत्या.पण अडीच वर्षांपूर्वी झालेल्या बंडाच्या वेळी त्यांनी शिंदे यांना साथ दिली.त्यामुळे उद्भव ठाकरे यांनी त्यावेळी चांगलाच संताप व्यक्त केला होता. मात्र गेल्या अडीच वर्षात वैदेही वाढाण यांची पक्षात साधी दखल घेतली गेली नाही.यंदा त्यांना विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळेल,अशी अपेक्षा होती,पण त्यांना उमेदवारी देण्यास अनेकांचा विरोध आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांची अनु.जाती व…
दीपक मोहिते, जागावाटप, जागावाटपात महाविकास आघाडीच्या शिवसेना ( उबाठा ) व महायुतीमधील भाजपला झुकते माप मिळणार, महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचे पथक येत्या २७ सप्टें.रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहे.दोन दिवसांच्या या दौऱ्यात हे पथक निवडणूकीसंदर्भात आढावा घेणार आहे.त्यांचा हा दौरा संपला कि विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.या निवडणुका साधारणपणे नोव्हें.महिन्याच्या मध्यास घेण्यात येतील,असा अंदाज आहे.त्यामुळे महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षाच्या जागावाटप प्रक्रियेला आता चांगलाच वेग आला आहे.महायुतीच्या घटक पक्षाचे नेते कितीही दावा करत असले तरी याविषयी होणाऱ्या त्यांच्या मॅरेथॉन बैठकीत एकमेकांवर कुरघोडी करण्याचे राजकारण होत आहे.भाजप व शिवसेना ( एकनाथ शिंदे गट )…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” आ.नितेश राणे यांच्या भगव्या झंझावातापुढे अजित पवारांचा गुलाबी रंग फिकट, गेल्या आठ ते दहा दिवसापासून अजित पवार गटावर एकामागोमाग संकटे कोसळत असून भाजपचे आ.नितेश राणे यांनी त्यांची पळता भुई थोडी केली आहे.तर दुसरीकडे शरद पवार यांनीही अजित पवार यांचा गळा पकडण्यास सुरवात केली आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी जर घड्याळ चिन्हाबाबत निर्णय लागणार नसेल,तर ते चिन्ह गोठवण्यात यावे,व फुटीर गटाला दुसरे चिन्ह देण्यात यावे,अशा आशयाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे.त्यामुळे अजित पवार गट सध्या अडचणीत आला आहे.एकीकडे काका आपल्याला अडचणीत आणण्यासाठी सतत जाळे फेकत असतो,तर दुसरीकडे नितेश राणे हे ” आम्हाला कोणी हिंदुत्व शिकवू नये,” असा दम भरू…
प्रवीण दवणे, डहाणू येथे झालेल्या लेखनस्पर्धेत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा उत्स्फूर्त प्रतिसाद, मोबाईलच्या विळख्यातही ग्रामीण भागातील विद्यार्थी लेखन व काव्यलेखन स्पर्धेत चुणूक दाखवून विविध विषयांवर आपला ठसा उमटवत आहे.त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा,यासाठी कोमसाप पालघर शाखा विविध उपक्रम राबवत असते. आज के.एल.पोंदा शाळेत कोकण मराठी साहित्य परिषद,डहाणू शाखेने डहाणू तालुकास्तरीय लेखन व काव्यलेखस्पर्धेचे व सन २०२३ साली विजेत्या स्पर्धका़ना बक्षीस पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन केले होते.याप्रसंगी दि डहाणू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष तरुणभाई पोंदा,सचीव सुधीर कामत,प्राचार्य सोपान इंगळे,कोमसाप पालघर जिल्हाध्यक्ष प्रवीण दवणे, शाखाध्यक्षा डॉ.अंजली मस्करेन्हस,सेवानिवृत्त कर्मचारी संघांचे तालुकाध्यक्ष मारुती वाघमारे,कार्यकारीणी सदस्य वसंत तांडेल,दिलीप जोंधळेकर,नीता नहार आदी मान्यवर उपस्थित होते. डहाणू तालुक्यातील १४ शाळा,…
दीपक मोहिते, मराठा व ओबीसी आंदोलक आमने-सामने, अंबड तालुक्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले आहेत. ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे वडीगोद्री इथे उपोषणाला बसले आहेत.घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिसांनी या परिसरात अतिरिक्त पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.अंतरवली सराटी गावाकडे जाणाऱ्या फाट्यावर वडीगोद्री या गावात मराठा आणि ओबीसी आंदोलक आज समोरासमोर आले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे.मराठा आंदोलक शहागडमार्गे बीड जिल्ह्यात प्रवेश करणार असून पोलीसानी या मार्गावर बंदोबस्त वाढवला आहे. मनोज जरांगे पाटील यांची शुक्रवारी प्रकृती बिघडल्याने मराठा समाजाचे अनेक आंदोलक अंतरवली सराटीत दाखल होत आहेत.अंतरवली सराटीत जाण्यासाठी लक्ष्मण हाके यांचं जेथे उपोषण सुरु आहे,त्या…
दीपक मोहिते, काँग्रेसचे विजय पाटील यांना वसईतून उमेदवारी मिळण्याची शक्यता, १३३,वसई विधानसभा मतदारसंघात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे विजय पाटील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी दिल्लीत जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत,त्यांच्या उमेदवारीसाठी एका माजी मुख्यमंत्र्यांनी दिल्ली दरबारी शिफारस केली आहे.या माजी मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला गांधी कुटुंबात वजन असल्यामुळे विजय पाटील यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.विजय पाटील यांनी २०१९ साली निवडणूक लढवली होती. त्यावेळी झालेल्या सरळ लढतीत त्यांचा पराभव झाला होता,पण समोर आ.हितेंद्र ठाकुर यांच्यासारखा दिग्गज उमेदवार असताना त्यांनी ७६ हजार ९५५ मताचा पल्ला गाठला होता.तत्पूर्वी २०१४ साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या मायकल फुर्टडो याना केवळ १६ हजार ४६७ मते पडली…
दीपक मोहिते, सरकार निवडणुकांना घाबरतय, महाराष्ट्र शासनाकडून जारी झालेल्या आदेशानुसार उद्या होणारी मुंबई विद्यापीठाची निवडणूक शासनाकडून पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्याचे परिपत्रक मुंबई विद्यापीठाने जारी केले आहे.त्यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.या निवडणुकीत पराभव झाल्यास त्याचा परिणाम आगामी होणाऱ्या निवडणुकांमध्ये होईल,अशा भितीमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या निवडणुका पुढे ढकलल्या असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेची ( सिनेट ) निवडणूक गेल्या अडीच वर्षापासून रखडल्या आहेत.या काळात दोन वेळा या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या. त्यानंतर आता विद्यापीठाने २२ सप्टें.ला ही निवडणूक घ्यायचं ठरवलं होते.पण ही निवडणूक पुढील आदेश मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या आहेत.परिपत्रकात…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” भाजपची पालघर मतदारसंघावर कावळ्याची नजर, राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वेगाने वाहू लागले आहेत.पालघर जिल्हा त्याला अपवाद नाही.कारण जिल्हा,तालुका व स्थानिक पातळीवर पदाधिकारी,कार्यकर्ते व बुथ प्रतिनिधींच्या बैठकांना वेग आला आहे.भाजपने आपल्या घटक पक्षातील ( शिंदे गट ) काही पदाधिकाऱ्यांची समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त्या करून तिरकी चाल खेळण्यास सुरुवात केली आहे.विधानसभा निवडणुकीसाठी ज्या इच्छुक उमेदवारांनी आपल्या गुडघ्याला बाशिंग बांधले होते,अशांची समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्त्या करून त्यांचा पत्ता कट केला आहे.पालघर विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाच्या वैदेही वाढाण यांची अनु.जाती-जमाती समितीवर सदस्य म्हणून नियुक्त करणे,हा त्याचाच एक भाग आहे.या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी त्या इच्छुक होत्या,पण त्यांचे स्वप्न भाजपच्या अशा खेळीमुळे…
