Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला धक्का ; सकल मराठा समाजाची फारकत, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची धरसोड वृत्ती व वारंवार भूमिका बदलण्याच्या धोरणामुळे त्यांचे आंदोलन सध्या उतरणीवर लागले आहे. सुरुवातीला ज्या मराठा संघटना त्यांच्या सोबत होत्या, त्यांनी आता मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनापासून फारकत घेतली आहे. दुसरीकडे नाशिक मधील मराठा समाजाच्या नेत्यांनी काल त्यांच्या आंदोलनावर जोरदार टीका केली आहे. या सर्व घडामोडीमुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न पुन्हा अडगळीत पडण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे झालेल्या समर्थकांच्या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत १९ सप्टें. रोजी मोर्चा मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल होणार असल्याचे जाहीर केले…

Read More

दीपक मोहिते, हुथी हे इराण – अमेरिका – इस्त्रायल युद्धात थेट सहभागी नाहीत, पण सतत दबाव टाकत असतात, अमेरिका – इराण युद्धात येमेनचे बंडखोर हुथी यांनी सौदी अरेबियावर ड्रोन व क्षेपणास्त्राच्या साहाय्याने नुकतेच जोरदार हल्ले चढवले, या हल्ल्यात सौदी अरेबियाचे प्रचंड नुकसान झाले. हे हुथी बंडखोर कोण आहेत ? त्यांची अमेरिका व सौदी अरेबिया या दोन देशाशी शत्रूत्व का आहे ? इराण – इस्त्रायल युद्धात ते इराणच्या बाजूने का लढतात ? याविषयींची सगळी माहिती आपण या लेखात घेणार आहोत. सर्वप्रथम या हुथी बंडखोरांचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊया. या हुथी बंडखोरांना पूर्वी अन्सार अल्लाह ( देवाचे समर्थक ) असे…

Read More

दीपक मोहिते, आज पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता, काल रात्रीपासून पालघर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. तब्बल ४० दिवसाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर परवा रात्रीपासून पावसाला पुन्हा सुरुवात झाली. हा पाऊस, तयार झालेल्या भातपिकासाठी मारक ठरणार कि तारक ठरणार हे येत्या तीन दिवसात मुसळधार पाउस झाल्यास कळणार आहे. पण सध्या तरी शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने आज पालघर, ठाणे, मुंबई, रायगड व रत्नागिरी या पाच जिल्ह्याला यलो अलर्ट दिला आहे. तसेच दिवसभर ताशी ४० ते ५० कि.मी. वेगाने वारे वाहतील, विजाच्या कडकडाटासह जोरदार वृष्टी होईल, असा इशारा दिला आहे. काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात पाणी…

Read More

दीपक मोहिते, यशस्वी जीवनाचे रहस्य, आपले जीवन यशस्वी करणे म्हणजे फक्त पैसा कमवणे नाही. कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी केवळ पैसा आवश्यक नाही, तर आरोग्य, नाती, मनःशांती व वाढ या चार महत्वाच्या गोष्टींची गरज असते. त्यासाठी निसर्ग ७ महत्वाचे नियम सांगतो. १ ) सकाळ जिंकली तर तुम्ही दिवस जिंकू शकता : दररोज पहाटे उठणे, ३० मिनिटे चालणे / योगा करणे, दिवसभरात मला काय कामे करायची आहेत, हे ठरवणे, हे पथ्य पाळणारे यशस्वी लोक दिवस सुरु होण्याआधीच दिवस जिंकतात. २ ) कोणत्याही एका गोष्टीत मास्टर व्हा : एखाद्या विशिष्ट क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा, पत्रकारितेत जसा मी खोलवर जातो, तसेच एखाद्या क्षेत्रात इतके चांगले…

Read More

दीपक मोहिते, ब्रिक्स परिषदेचा भारताला मोठा फायदा होणार आहे,वाढवण बंदरासाठी जगभरातून गुंतवणूकदार येणार, वसई व पालघरमधील तरुणांना ब्रिक्समध्ये स्टार्टअपची संधी मिळणार, आजपासून दिल्लीत सुरु झालेल्या ब्रिक्स परिषदेला सर्व देश व १० पार्टनर देशाचे प्रमुख उपस्थित आहेत. भारत,बेलारुस, इराण,रशिया, चायना कझाकस्तान, मलेशिया, थायलंड, क्यूबा,ब्राझील,नायजेरिया, उझबेकिस्तान, युगांडा, व्हिएतनाम, फिलिपीन्स, संयुक्त राष्ट्र समितीचे महासचिव अँटॉनियो गुटरेस,यांचा समावेश आहे. या परिषदेत एकूण सात ते आठ मुद्द्यावर चर्चा होणार आहे. यामध्ये भारत, ब्राझील व दक्षिण आफ्रिका या देशाच्या भूमिकेला बळ देण्याचे समर्थन, स्थानिक चलनातील व्यापारवाढीसाठी ब्रिक्स पेमेंट टास्क फोर्स तयार करणे, दहशतवादाचा निषेध व ग्लोबल साऊथ मधील गरिबी निर्मूलनासाठी एकत्रित काम करणे, कृत्रिम बुद्धिमत्ता (…

Read More

दीपक मोहिते मुंढवा जमीन घोटाळा ; पार्थ पवार यांना अडकवण्यासाठी राजकीय शक्ती सक्रिय, काल एका बातमीने राज्यातील जनतेचे चांगलेच लक्ष वेधून घेतले. पुणे जिल्ह्यातील मुंढवा जमीन प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने दोन दिवसापूर्वी या जमीन घोटाळ्यात कंपनीचे संचालक म्हणून पार्थ पवार यांचे नांव समोर आले असताना त्यांना आरोपी का केले नाही ? ते प्रभावशाली नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव असल्यामुळे त्यांचे नांव वगळले का ? असा प्रश्न विचारत पोलीस महासंचालकांना वैयक्तिक प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे आदेश दिले. आता या प्रकरणी येत्या २८ सप्टें. रोजी पुढील सुनावणी आहे. पुणे मुंढवा सर्व्हे क्र. ८८ येथे सुमारे ४२ एकर जमीन आहे. ही जमीन महार…

Read More

दीपक मोहिते, राहुल गांधी यांचे राजकीय वजन वाढत आहे, एकेकाळी राजकारणातला ” पप्पू,” म्हणून ज्या राहुल गांधी यांना भाजपच्या आयटी सेलने सतत हिणवले, त्या भाजपला म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना राहुल गांधी संसदेत व बाहेर भारी पडले आहेत. संसदेत राहुल गांधी व त्यांची बहीण प्रियांका गांधी यांच्या तोफखान्याला तोंड देताना भाजप हतबल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जंतरमंतरवर झालेल्या आंदोलनात विद्यार्थ्यांना दिल्ली पोलिसांकडून झालेल्या मारहाणप्रकरणी हे दोघे बहीणभाऊ संसदेत आपली कोंडी करतील, अशा भितीतून मोदी व शहा जोडगोळीने संसदेत उपस्थित राहणे टाळले. संसदेच्या इतिहासात आजवर असे कधीच घडले नव्हते. तरीही या प्रकरणी मोदी सरकारला माघार घ्यावी…

Read More

दीपक मोहिते, गेल्या ४० दिवसापासून राज्यातला पाऊस गायब, भविष्यात अस्मानी संकट, गेल्या चाळीस दिवसापासून राज्यातील पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी फेब्रु. महिन्यापासून राज्यात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. हवामान विभाग व हवामान विषयक तज्ञ या सगळ्यांचे अंदाज खोटे ठरवत पावसाने वाकुल्या दाखवल्या आहेत. जुलैच्या सुरुवातीला पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी भराभर शेतीची कामे उरकली, पण आगामी काळातील रब्बी हंगामाचे काय ? याविषयी सरकारी पातळीवर कोणीही बोलायला तयार नाही. ग्रामीण भागातील शेतीला पाणी उपलब्ध करण्यासंदर्भात सरकारचे दिशाहीन धोरण हे ग्रामीण अर्थव्यवस्थेचे तीनतेरा वाजवणारे ठरले आहे. डोंगरमाथ्यावरुन प्रचंड प्रमाणात वाहून जाणारे पाणी अडवणे, लहान धरणे विकसित करणे, नवीन धरणे उभारणे…

Read More

दीपक मोहिते, सारासार विचार करण्याची गरज आहे… *वसई तालुका व मिरा – भाईंदर हे दोन्ही परिसर दिवसेंदिवस अतिसंवेदनशील होत आहेत. मराठी – इतर भाषिक, मराठी – जैन व आता हिंदू – इतर असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात राहायचे असल्यास मराठी भाषा बोलता आली पाहिजे, पर्युषण काळात मांस – मासे विक्रीला बंदी, मुलांच्या डब्यातील खाद्यपदार्थात लसूण व कांदा असू नये, यावरून मिरा – भाईंदर परिसर सध्या चांगलाच गाजू लागला आहे. तर दुसरीकडे वसई तालुक्यात गणेश चतुर्थी सणाच्या तयारीसाठी महानगरपालिका प्रशासनाने बिगर हिंदूंना कामाचे ठेके देण्यात येऊ नये, अशा आशयाचे पत्र भाजपच्या एका नगरसेवकाने दिले आहे. या सर्व घडामोडीमुळे हे…

Read More

दीपक मोहिते, समाजात इतकी असंवेदनशीलता येते तरी कुठून ? देशाच्या राजधानीत जे काही घडलं ते माणुसकीला काळे फासणारे होते. तसेच ते समाजाला सुन्न करणारे देखील आहे. देशाच्या राजधानी दिल्लीत गेली जवळपास दोन दशके वास्तव्यास असलेला प्रख्यात मणिपुरी गिटारवादक चोंगथम विक्रम सिंह यांस आठ-दहा जणांनी ठेचून मारले. विक्रम सिंह यांचे वय ५४, शरीरानेही तसे ते कृशच. त्यांचे पाप इतकेच की मध्यरात्रीच्या सुमारास घराखाली गोंगाट करणार्‍या रिकामटेकड्याना ते ” शांत बसा, ” असे सांगायला गेले. अलीकडे एका मोठ्या बिनडोक बहुल समाजास वाद्यांचा, फटाक्यांचा, ते काही नसेल तर गाठ्या-फाफडा खात इतरांचे डोके उठवणारा गोंगाट करणे, हे पौरुषत्वाचे लक्षण वाटू लागले आहे. या अशा…

Read More