- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- १९८० चा अटलबिहारी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही…
- ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे…
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” १९८० चा अटलबिहारी वाजपेयी यांचा भाजप आता पाहायला मिळणार नाही… ” सत्तेसाठी काय पन,” सध्या या वाक्याचा आपण पावलोपावली अनुभव घेतोय. ज्या ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचा भारतीय राजकारणात दबदबा होता, तो नुकत्याच झालेल्या पराभवानंतर ओसरत चालला आहे. बंगालची शेरनी आणि भावी पंतप्रधान म्हणून सतत गुणगान गाणारे त्यांचे सहकारी आता त्यांना सोडचिट्ठी देत आहेत. दोन महिन्यांपूर्वी जे भाजपला लाखोली वाहत होते, ते आज भाजपच्या तंबूत विसावले आहेत. सयानी घोष या ममता बॅनर्जी अत्यंत विश्वासू सहकारी, त्यांनी या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसची खिंड एकट्याने लढवली. मुळात प.बंगालच्या सिनेजगतातील त्या नावाजलेल्या पार्श्वगायिका व अभिनेत्री, ममता बॅनर्जी यांनी त्यांना राजकारणात आणले…
दीपक मोहिते, ” अल निनो,” हे नैसर्गिक संकट असून कृषी क्षेत्राला मारक आहे… गेल्या काही दिवसापासून ” अल निनो,” ची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. हे अल निनो म्हणजे नक्की काय ? त्याची जगभरात इतकी दहशत का आहे ? या दोन प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. अल निनो हा एक स्पॅनिश शब्द असून त्याचा शब्दशः अर्थ आहे ” लहान मुलगा किंवा बाल येशू,” असा आहे. दक्षिण अमेरिकेतील पेरू आणि इक्वाडोर या दोन देशाच्या किनारपट्टीवर ख्रिसमसच्या दरम्यान तप्त असा सागरी प्रवाह येतो. हे पाणी जेंव्हा उष्णतेचे उच्चतम पातळी गाठते, तेंव्हा जागतिक स्तरावर हवामान बदलत असते. या अल निनो च्या प्रभावामुळे…
दीपक मोहिते, केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत, नीट पेपर फुटीवरून सध्या देशभरात वादळ उठले आहे. सरकारला शिक्षण, उद्योग, व्यापार, कृषी व रोजगार क्षेत्रात आलेले अपयश लक्षात घेता तरुण वर्गात सरकारविरोधात प्रचंड चीड निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे. बेरोजगारीमुळे देशातील सुमारे २ कोटी तरुण सध्या नैराश्यात सापडले आहेत. शेतमालाला किमान हमीभाव मिळत नसल्यामुळे शेतकरीवर्गही संताप व्यक्त करत आहे. दुसरीकडे शिक्षण क्षेत्राची मोठ्या प्रमाणात अवहेलना होत असल्यामुळे विद्यार्थी देखील आता आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून शिक्षण व्यवस्थेची रया पार बिघडून गेली आहे. पेपर फुटणे, हे आपल्या पाचवीला पुजले आहे. मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने…
दीपक मोहिते, इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला, इराण – अमेरिका व इराण दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या मागे अनेक कारणे आहेत. आखाती देशातील खनिज तेलाचा विपुल साठा व पॅलेस्टाईनच्या भूमीवरून मूळ निवासी असलेल्या अरबाची हकालपट्टी, अशी दोन कारणे असली तरी गेल्या काही वर्षात इराणची अणुबॉम्ब तयार करण्याच्या दिशेने सुरू झालेली वेगवान वाटचाल हे मुख्य कारण आहे. त्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे हट्टाला पेटले आहेत. इराणच्या या कथित अणुबॉम्बची सर्वाधिक भिती इस्त्रायलला आहे. त्यामुळे इस्त्रायल हा गेल्या अनेक वर्षांपासून मध्यपूर्वेतील मुस्लिम राष्ट्रविरोधात अमेरिकेला सतत उसकावत असतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था गेल्या काही दशकापासून ज्यू उद्योगपतींच्या लॉबीच्या हातात असून ही लॉबी अमेरिकेच्या अर्थ,व्यापार,उद्योग व…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महिलांना डावलणे ; ” देवाभाऊ,” चे ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण, गेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने ” लाडकी बहीण, ” योजना कार्यान्वित करून विरोधी पक्षाचे सारे मनसूबे धुळीला मिळवले. दरमहा २ कोटी ४० लाख महिलांच्या बँक खात्यात १५०० /- रु. जमा करून महायुतीने. निवडणुकीत महाविकास आघाडीचा निवडणुकीत अक्षरशः पालापाचोळा केला. या धक्यातून विरोधक अद्याप स्वतःला सावरू शकलेले नाहीत. त्या निवडणुकीत राज्यातील समस्त महीला मतदारांनी महायुतीला डोक्यावर घेतले. महिलांचा मिळालेला उदंड प्रतिसाद लक्षात घेऊन महायुतीने “नारीशक्ती,” ” मातृवंदना,” ” लाडकी बहीण,” अशा गोंडस शब्दाचा वापर करत महायुती सरकार महिलांच्या सक्षमीकरण करत असल्याचा दावा करू…
दीपक मोहिते, कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार, काल कॉक्रोच जनता पार्टीचे ( सीजेपी ) अध्यक्ष अभिजित दिपके हे दिल्लीत आल्यानंतर जंतर-मंतरवर हजारो तरुणांनी केलेली गर्दी व आंदोलनाला जनतेचा मिळालेला पाठिंबा लक्षात घेता येणाऱ्या काळात या ठिणगीचा चांगलाच भडका उडण्याची शक्यता आहे. काल झालेल्या या आंदोलनानंतर दोन गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. अभिजित दिपके यांनी सुरु केलेल्या या लढ्यात त्याच्या पक्षाला सरकार व मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे. जंतर मंतरवर झालेले हे आंदोलन प्रचंड यशस्वी झाले. पण एकाही वृत्तवाहिनीने त्याचे थेट प्रक्षेपण दाखवणे टाळले. सोशल मिडियावर मात्र या घटनेच्या बातम्या व फोटोचा अक्षरशः पाऊस…
दीपक मोहिते, ” फ्रंटलाईन,” डोनाल्ड ट्रम्प ;… तर असा मित्र नसलेलाच बरा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल केलेल्या एका वक्तव्याने त्यांनी एकतर ताळतंत्र सोडले आहे किंवा त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली असावी,असे वाटू लागले आहे. ट्रम्प हे गेल्या काही महिन्यांपासून भारताला कमी लेखण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. काल त्यांनी ” भारताने गेली अनेक दशके अमेरिकेला लुटले असून भारतीय मालावर भरमसाठ शुल्क लावण्याच्या आपल्या निर्णयावर आपण आजही ठाम असल्याचे सांगितले.” हे सांगत असताना दुसरीकडे नरेंद्र मोदी मला खूप आवडतात व ते माझे चांगले मित्र आहेत, हे देखील सांगायला विसरत नाहीत.त्यांचे हे वागणे पोटात एक आणि ओठावर दुसरेच असे आहे. भारत…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” कार्यकर्त्यांची ओळख ; पूर्वी ” पायपुसणी,” अशी होती, ती आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे… राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यांच्या ( घराणेशाही ) प्रथेमुळे आजवर अनेक प्रामाणिक कार्यकर्त्यांवर अन्याय होत आला. या विषयावर अनेक विचारवंतांनी आजवर खूप लिहिले, पण परिस्थितीत कोणताही बदल होऊ शकला नाही. विविध पक्षातील प्रामाणिक कार्यकर्ते वर्षानुवर्षे पक्षात सतरंज्या उचलण्याचे काम करत आहेत. अशा या कार्यकर्त्यांचा पक्षात ” अंधभक्त,” म्हणूनच वावर होत असतो. याला आज एकही राजकीय पक्ष अपवाद ठरू शकला नाही.जवळपास सर्वच पक्षात कार्यकर्त्यांवर असे बलात्कार होत असतात. शरद पवार,अजित पवार, सुप्रिया सुळे, सुनील तटकरे, एकनाथ शिंदे, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, नितीश…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” ममता बॅनर्जीं यांचा उद्धव ठाकरे होणार… पश्चिम बंगालमध्ये मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळू लागले आहेत, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे व शरद पवार यांचे जे काही झाले तेच तृणमूल काँग्रेस च्या ममता बॅनर्जी यांच्या बाबतीत होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालमध्ये ज्या काही राजकीय हालचाली होत आहेत, त्यावरून लवकरच भूकंप होण्याची चिन्हे आहेत. ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींना वगळून नवीन टीएमसी स्थापन करण्याचे प्रयत्न होत असल्याचे संकेत मिळत आहेत.दोन आमदारांना पक्षातून काढल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उलथापालथी सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातील शिवसेनेप्रमाणेच टीएमसीमध्ये फूट पाडण्याचा ‘महाराष्ट्र मॉडेल’ वापरला जात आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली, ठाणे – पालघर विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे रविंद्र फाटक हे प्रचंड मतांनी निवडून येतील, असा अंदाज होता. पण त्यांची निवड बिनविरोध होईल,असे कोणालाही वाटले नव्हते. शिवसेनेला ही जागा मिळावी, यासाठी एकनाथ शिंदे यांनी केलेले प्रयत्न स्तुत्य असेच होते.त्यांनी वनमंत्री गणेश नाईक व भाजपचे आ. संजय केळकर या दोघांना धोबीपछाड देत,ही जागा आपल्या पदरात पाडली. या सर्व घडामोडीनंतर ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी शिंदे यांनी आपली राजकीय ताकद जी पणाला लावली ती नक्कीच अभिनंदनास पात्र आहे. निवडणुकीपूर्वी पालघर जिल्ह्यात अनेक वावड्या उठल्या व अफवांचे अमाप पीक आले होते. त्यामध्ये अनेक युट्युब…
