- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर : खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार….
- ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज,
- भारतीय संविधानाचे देशाच्या विकासामध्ये मोठे योगदान,
- मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात,
- प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक….
- अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली,
- ममता बॅनर्जीचा राजीनामा देण्यास नकार, कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता,
- कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे,
Author: दीपक मोहिते
दीपक मोहिते, ” आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहीकडे,” मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर ; खरीप हंगामाला सुगीचे दिवस येणार…. आगामी मान्सूनच्या लवकर आगमनाची बातमी शेतकऱ्यांसाठी आनंदाची ठरली आहे. यंदा वेळेआधीच मान्सून अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. ” स्कायमेट,” ने जाहीर केलेल्या अंदाजानुसार, मान्सून लवकरच अंदमानात दाखल होण्याची शक्यता आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिण-पश्चिम भागात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. राज्यात सध्या कडक उन्हाळा आणि उकाडा जाणवत असतानाच हवामान खात्याकडून एक दिलासा देणारी बातमी प्रसिद्ध झाली आहे. यंदाचा मान्सून अंदमानात वेळेच्या आधीच दाखल होण्याची शक्यता आहे. खाजगी हवामान संस्था ” स्कायमेट,” च्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण…
दीपक मोहिते, सूर्यातीर, ग्रामीण भागात रस्तेबांधणीच्या कामाला प्राधान्य देण्याची गरज, २०१४ साली केंद्रात राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर भाजपने देशभरात रस्तेबांधणी,रेल्वे व अन्य पायाभूत सोयी- सुविधांवर ( उड्डाणपूल,मेट्रो,वेगवान रेल्वे व आता बुलेट ट्रेन ) लक्ष केंद्रित केले आहे. या काळात केंद्रीय रस्ते बांधणी व विकास खात्याची जबाबदारी पेलणाऱ्या नितीन गडकरी यांनी रस्त्याचे जाळे विणले. ग्रामीण भाग व शहरांना एकमेकांशी जोडण्यासाठी समृद्धी,द्रुतगती व कोस्टल रोड,इ. योजना राबवण्यास सुरुवात केली. यामध्ये त्यांना भरीव यश देखील प्राप्त झाले.त्यांचे मंत्रालय व राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम / रस्ते विकास महामंडळ यांच्या संयुक्त प्रयत्नातून ठाणे,नाशिक,अकोला यवतमाळ, नागपूर व अन्य शहरे एकमेकांशी जोडली गेली. एकेकाळी रस्ते…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन, भारतीय संविधानाचे देशाच्या विकासात मोठे योगदान, गेल्या वर्षी आपण भारतीय संविधानाचे अमृतमहोत्सवी वर्ष साजरे केले. ब्रिटिश साम्राज्याच्या जोखडातून मुक्ती मिळाल्याचा आनंद व संविधान अमलबजावणीचा उत्सव म्हणून दरवर्षी हा दिवस आपण साजरा करत असतो. १५ ऑगस्ट १९४७ साली आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर दोन वर्षानंतर देशाच्या संविधान समितीने २६ नोव्हें.१९४९ साली संविधानाचा मसुदा स्विकारला व २६ जाने.१९५० रोजी आपले संविधान अमलात आले. स्वातंत्र्यपूर्व काळात व स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आपल्याला स्वतःचे असे संविधान नव्हते. १५ ऑगस्ट १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अवघ्या १४ दिवसात २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचे संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन करण्यात आली. या…
दीपक मोहिते, मनरेगा कामातील बजबजपुरीमुळे आदिवासी स्थिरावतोय अन्य क्षेत्रात, पालघर जिल्ह्यात शेतीची कामे सुरू होईस्तोवर ग्रामीण भागातील आदिवासी विविध क्षेत्रात काम करून रोजगार मिळवत असतो. लाकडाच्या मोळ्या,रानभाज्या व फळे विक्री करून आदिवासी समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात.पावसाळ्यानंतर या आदिवासी मजुरांच्या हाताला काम नसते. त्यामुळे तो शहरी भागात स्थलांतर करत असतो.बांधकाम क्षेत्रात बऱ्यापैकी आर्थिक आवक होत असल्यामुळे तो या क्षेत्रात स्थिरावतो. या मजुरांच्या हाताला आपल्या परिसरात काम मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या मनरेगामध्ये अधिकाऱ्यांच्या अनागोंदी व भ्रष्ट कारभारामुळे आदिवासी हल्ली या कामावर यायला तयार नसतात. ग्रामीण भागातील नागरीक, शेती, मनरेगा व वाड्यावर मजूर म्हणून काम करत दिवसाकाठी २०० ते २५० रु.कमवतात.…
दीपक मोहिते, फ्रंटलाईन – संपादकीय लेख, प्रादेशिक अस्मितेत लक्षणीय वाढ ; राष्ट्रीय एकात्मकतेला हानिकारक…. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात अनेक निवडणुका पार पडल्या, सत्तेच्या या रणधुमाळीत अनेक पक्ष नव्याने सामील झाले तर अनेक पक्षांची वाताहात झाली. आजच्या घडीला अस्तित्वात असलेल्या पक्षांची संख्या लक्षात घेता,” पायलीला पन्नास, ” असं वर्णन केल्यास ते चुकीचे ठरु नये. प्रादेशिक पक्षाची झालेली वाढ व त्यांना सोबत घेतल्याशिवाय ” सत्तेची पाऊलवाट, ” सापडत नाही,अशी स्थिती सध्या आपल्या देशात निर्माण झाली आहे. सन १९९० च्या दरम्यान प्रादेशिक पक्षांच्या संख्येत वाढ होत गेली.तत्पुर्वी अकाली दल, डीएमके, अण्णाडीएमके,शिवसेना,तेलगू देशम व ईशान्येकडील काही राज्यात प्रादेशिक पक्ष सक्रिय होते. आज ही संख्या दुपट्टीने…
दीपक मोहिते, बॉटमलाईन, अमेरिकेची दादागिरी अखेर इराणने संपवली, इराण व अमेरिका – इस्त्रायल यांच्यामध्ये सध्या युद्धविराम झाला असला तरी या युद्धात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. इराण हा अमेरिकेच्या तुलनेत अतिशय लहान देश असताना त्यांनी अमेरिका व इस्रायलची दादागिरी झुगारून लावली.” आम्ही मरण पत्करू, पण मान झुकवणार नाही,” अशी भूमिका इराणने घेतली व त्यांचा प्रत्येक हल्ला यशस्वीपणे परतवून लावला. इराणने गेल्या काही वर्षात जी काही लष्करी तयारी केली,त्याचा थांगपत्ता त्यांनी अमेरिकेच्या सीआयए व इस्रायलच्या मोसाद या नावाजलेल्या गुप्तहेर संस्थांना लागू दिला नाही.त्यामुळे दोघांचे अतोनात नुकसान झाले.लष्काराच्या वाढीव खर्चासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना आता काँग्रेससमोर जावे लागणार आहे.पण…
दीपक मोहिते, ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार,कलम ३५६ चा वापर होण्याची शक्यता, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपल्या पक्षाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. त्यांनी घेतलेला हा पवित्रा त्यांना त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.अशा परिस्थितीमुळे राजकीय पेच निर्माण झाला आहे. अशावेळी भाजप,आपले सरकार कसे स्थापन करू शकते ? संविधानातील कलम १६४ आणि ३५६ अंतर्गत कोणते पर्याय उपलब्ध आहेत ? यावर संविधान तज्ञ सध्या अभ्यास करत आहेत. पश्चिम बंगालमध्ये भाजपचा मोठा विजय झाला असून तृणमूल काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. या पराभवानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला आहे. आम्ही निवडणूक हरलो नाही, त्यामुळे राजीनाम्याचा प्रश्नच…
दीपक मोहिते, कितीही प्रयत्न करा, पण आता परिस्थिती हाताबाहेर गेली आहे, दरवर्षी पावसाळा तोंडावर आला की नालेसफाई,रेल्वेचे कॅल्व्हर्टस,नैसर्गिक नाले,पावसाळी पाणी खाडीत जाण्यासाठी असलेल्या मार्गातील अडथळे दूर करणे, इ.कामाना महानगरपालिका प्रशासन प्राधान्य देत असते. पण,वसई, नालासोपारा व नवघर – माणिकपूर ही तीन शहरे गेली अनेक वर्षे पाण्यात बुडत असतात. हे दुष्टचक्र गेली अनेक वर्षे तहहयात सुरूच आहे. यंदाही तीच परिस्थिती निर्माण होणार आहे.खाड्या बुजवून जी बांधकामे उभारण्यात आली आहेत,ती या अस्मानी संकटाला आमंत्रण देणारी ठरली आहेत. त्यामुळे अतिवृष्टी झाली किंवा समुद्राला भरती आली की या उपप्रदेशात हाहाकार उडतो. भरतीचे पाणी व पावसाळी पाणी अडते व संपूर्ण परिसर पाण्यात बुडतो. नायगाव खाडी…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल, ” महाराष्ट्राला ” जाणता राजा,” नकोय, तर जागता पहारेकरी,” हवा, काल राज्याचा वर्धापनदिन आपण मोठ्या उत्साहात साजरा केला. १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आपण आणला. त्यासाठी १०५ हुतात्म्यानी आपल्या प्राणाची आहुती दिली व तत्कालीन केंद्र सरकारला लोकभावनेसमोर आपली मान झूकवावी लागली. ज्यानी या राज्याच्या उभारणीसाठी आपले सर्वस्व वेचले, स्वत;च्या संसाराची होळी केली, तो महाराष्ट्र गेल्या सहा दशकाच्या वाटचालीनंतर नेमका कुठे उभा आहे ? याचा शोध घेणे गरजेचे आहे,म्हणून हा लेखप्रपंच… चला बघूया समकालीन समाजधुरीणानी संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी किती खस्ता खाल्या. २१ नोव्हे. १९५६ रोजी सकाळी फ्लोरा फाउंटन परिसरात प्रचंड तणावाचे…
दीपक मोहिते, सोशल मीडिया शाप की वरदान ? देशातील महत्वाच्या निवडणुका गेल्या वर्षभरात पार पडल्या. गेले वर्षभर धडाडणाऱ्या तोफा आता पुढील पुढील निवडणुकापर्यंत आता थंडावल्या आहेत. एकमेकांच्या उखाळ्या – पाखाळ्या ऐकण्यात आपले आपले वर्ष कधी निघून गेले, ते कळले देखील नाही. या निवडणुकीच्या प्रचारात सोशल मीडियावरील करामतीमुळे तर मतदारांचे चांगलेच मनोरंजन झाले. निवडणूक प्रक्रियेत सोशल मीडिया, हे आता सर्वात प्रभावी माध्यम ठरले आहे आणि लोकानी ते मनापासून स्विकारले आहे. पूर्वी पक्षांची मुख्यालये, ही निवडणुक प्रक्रियेतील महत्वाची केंद्रे म्हणून ओळखण्यात येत असत, आता त्याची जागा सोशल मीडियाच्या वॉररुमने घेतली आहे. या वॉररुम आता अत्यंत प्रभावी ठरू लागल्या आहेत. ” होत्याचे नव्हते…
