Author: दीपक मोहिते

दीपक मोहिते, विरोधी पक्षाकडून ७.८ टक्के जीडीपी वाढीच्या आकडेवारीवर संशय व्यक्त, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी एक्सवर म्हटले, “बेरोजगारी ५० वर्षांतील सर्वोच्च पातळीवर आहे. ४० टक्के पदवीधर तरुण बेरोजगार आहेत. जुलै २०२६ मध्ये २५ वर्षे वयोगटातील प्रत्येक ०५ भारतीय तरुणांपैकी एक बेरोजगार होता. दरवर्षी ०२ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन पूर्णपणे फसले आहे.” किरकोळ महागाई गेल्या १९ महिन्यांतील सर्वोच्च स्तरावर आहे आणि साखर, कांदा, टोमॅटो, डाळी, स्वयंपाकाचे तेल, तांदूळ, दूध आणि स्वयंपाकघरातील प्रत्येक अत्यावश्यक वस्तूच्या किमती सतत वाढत आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये अर्थसचिव पदी कार्यरत असलेले सुभाषचंद्र गर्ग यांनीही जीडीपीच्या आकडेवारीवर शंका व्यक्त केली आहे. त्यांनी…

Read More

दीपक मोहिते, वसईत स्मार्ट मीटरविरोधात ७ सप्टें. रोजी सर्वपक्षीय आंदोलन, वसई तालुक्यात महावितरणतर्फे जुने वीज मीटर बदलून त्याजागी नवीन स्मार्ट मीटर बसवण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. मात्र या स्मार्ट मीटरमुळे ग्राहक वर्गात प्रचंड नाराजीचे वातावरण पसरले आहे. वीजदेयकात अवाजवी आणि दुप्पट वाढ होत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिक करत आहेत. तसेच ग्राहकांची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता जुने मीटर काढून थेट नवीन मीटर लावण्यात येत असल्यामुळे महावितरण विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे. याप्रकरणी वसई-विरारमधील सर्व राजकीय पक्ष एकवटले असून प्रशासना विरोधात येत्या ७ सप्टें. रोजी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर शिरसाड फाटा, के. टी. रिसॉर्टसमोर महामार्ग रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्हा परिषदेत शिक्षक भरती प्रक्रिया वेगात सुरु, जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त शिक्षक पदे भरण्याच्या प्रक्रियेला आता प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.पवित्र प्रणालीअंतर्गत प्राप्त झालेल्या उमेदवारांच्या यादीतील पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी काल २ सप्टें.पासून सुरू झाली आहे. ही पडताळणी उद्यापर्यंत जिल्हा परिषद पालघर कार्यालयात सुरु राहणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५च्या आधारे पद निवडीचा विकल्प दिलेल्या संस्थांमध्ये ही शिक्षक पदभरती करण्यात येत आहे. जिल्हा परिषद पालघरसाठी पवित्र प्रणालीअंतर्गत मराठी व उर्दू माध्यमातील उमेदवारांची यादी उपलब्ध झाली आहे. मराठी माध्यमातील पदनिहाय आकडेवारीनुसार २ री ते ५ वी – ३२८ पदांसाठी ३४७ उमेदवार, ६ वी ते ८ वी – विज्ञान…

Read More

दीपक मोहिते, पालघर जिल्हा प्रशासन व वयम यांच्यात सामंजस्य करार, पालघर जिल्ह्यातील सामुदायिक वनसंसाधन हक्कांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन आणि नैसर्गिक संसाधनांच्या सुशासनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या वयम या स्वयंसेवी संस्थेशी काल सामंजस्य करार करण्यात आला. या सामंजस्य करारावर जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड, पालघर आणि वयमचे सचिव व विश्वस्त मिलिंद थत्ते यांनी स्वाक्षऱ्या केल्या. अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक वननिवासी ( वनहक्कांची मान्यता ) अधिनियम, २००६ अर्थात वनहक्क कायद्यांतर्गत पात्र गावांमध्ये सामुदायिक वनसंसाधन हक्कांची मान्यता सुनिश्चित करण्याची जबाबदारी जिल्हास्तरीय समितीची असून, या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतात. वनसंसाधनांचे संरक्षण, संवर्धन व व्यवस्थापन यामध्ये ग्रामसभा ही प्रमुख संस्था…

Read More

दीपक मोहिते, जव्हार येथे राष्ट्रवादी काँग्रेसची तिरंगा रॅली, राज्यातील वाढती बेरोजगारी, रखडलेली शासकीय भरती प्रक्रिया आणि युवकांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्यातर्फे काल जव्हार येथे ‘ बेरोजगार हक्क एल्गार,’ तिरंगा रॅली काढण्यात आली. माजी आ. सुनील भुसारा आणि पालघर जिल्हाध्यक्ष प्रीतम (सनी) एकनाथ पवार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या रॅलीत जव्हार, विक्रमगड, मोखाडा आणि वाडा तालुक्यांतील पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. गोरवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून रॅलीला सुरुवात झाली. राज्यातील रिक्त शासकीय पदांची तातडीने भरती करावी, पोलीस भरती प्रक्रिया वेगाने राबवावी, परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांना आळा घालावा तसेच स्थानिक युवकांना…

Read More

दीपक मोहिते, वसई-विरारच्या विविध प्रश्नासाठी माजी खा.किरीट सोमय्या यांचा धावता दौरा, वसई-विरार शहरातील विविध नागरी, प्रशासकीय तसेच कायदा-सुव्यवस्थेशी संबंधित प्रश्न व समस्यांचा आढावा घेण्यासाठी माजी खा. किरीट सोमय्या यांनी आज वसई-विरार परिसराचा दौरा केला. दौऱ्यादरम्यान नालासोपारा विभागाचे सहा. पोलीस आयुक्त तसेच बोळींज पोलीस ठाण्याला भेट देऊन परिसरातील कायदा व सुव्यवस्थेबाबत सविस्तर चर्चा केली. परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर चाप लावावा, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर उपाययोजना करण्यात याव्यात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. त्यानंतर त्यांनी वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन शहरातील विविध नागरी प्रश्नांवर चर्चा केली. विशेषतः कचरा घोटाळ्याची तात्काळ चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित…

Read More

दीपक मोहिते, अंजुमन इस्लामतर्फे ४३ वा सत्कार सोहळा उत्साहात साजरा, अंजुमन इस्लाम विरार शाखेतर्फे यंदाही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आ. हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. शनी. २९ ऑगस्ट रोजी विरार पूर्व भागातील मंगल कार्यालयात हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी महापौर अजीव पाटील, आ. राजेंद्र गावित व संस्थेचे सरचिटणीस इस्माईल खान आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रमात शालांत परीक्षेत ज्या पाच विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली, त्यांचा पाहुण्यांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. त्यामध्ये ध्रुव पराग राऊत – ९७. ६० %, नील अजय मिस्त्री – ९७.६० %, मृणालिनी मनमोहन पाटील – ९७.२० %, समृद्धी…

Read More

दीपक मोहिते, वाढवण बंदर ; नुकसानभरपाई पॅकेजबाबत ८ सप्टें. रोजी हितधारकांची बैठक, वाढवण बंदर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या मच्छीमार समुदायासाठी न्याय्य, पारदर्शक आणि सर्वसमावेशक पुनर्वसन व नुकसानभरपाई प्रक्रिया सुनिश्चित करण्यासाठी पालघर जिल्हा प्रशासन कटिबद्ध असल्याचे प्रशासनाने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. वाढवण बंदर प्रकल्पाचे नियोजन सुरू झाल्यापासून प्रकल्पाच्या अंमलबजावणीदरम्यान स्थानिक मच्छीमारांची उपजीविका आणि त्यांचे सामाजिक व आर्थिक हित यांना योग्य प्राधान्य दिले जावे, अशी भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. याप्रकरणी अनेक बैठका घेण्यात आल्या असून, मत्स्यव्यवसाय विभागातर्फे मच्छीमारांशी नुकसानभरपाईच्या मसुद्याबाबत प्राथमिक चर्चाही करण्यात आली आहे. या प्रक्रियेचा एक भाग म्हणून, बाधित क्षेत्रातील मच्छीमार कुटुंबांची उपजीविका मासेमारीवर किती अवलंबून आहे, हे समजून…

Read More

दीपक मोहिते, कायमस्वरूपी पुलासाठी जिल्हा प्रशासनाकडून राज्य शासनास प्रस्ताव सादर, पालघर जिल्हा प्रशासनाने पालघर तालुक्यातील वाढीव व वैती या गावांसाठी कायमस्वरूपी, सुरक्षित व बारमाही दळणवळण सुविधेचा प्रस्ताव नुकताच सादर केला आहे. क्षेत्रीय पाहणी व तांत्रिक तपासणीनंतर पुलाच्या बांधकामाचा प्रस्ताव व आराखडा पुढील मान्यतेसाठी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. वाढीव व वैती या गावांची लोकसंख्या अनुक्रमे ७७२ व ७१६ असून ही गावे चोहोबाजूंनी वैतरणा नदीने वेढली आहेत. भरती-ओहोटीच्या वेळी नदीवरील मोठ्या पुलाच्या माध्यमातूनच दळणवळण उपलब्ध करून देणे आवश्यक असलेले, एका विलग बेटवजा वस्तीचे हे वैशिष्ट्यपूर्ण प्रकरण आहे. गावात ७ वी पर्यंत शाळा असून इयत्ता ८ वी ते १२ वी चे…

Read More

दीपक मोहिते, वसई व नालासोपाऱ्याच्या मतदारांमध्ये प्रचंड नैराश्य, गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर वसई – विरारचे राजकारण सध्या वेगळ्या वळणावर येऊन ठेपले आहे. ठाकूर यांच्या ३५ वर्षाच्या राजकीय साम्राज्याला आपण सुरुंग लावू शकतो,असा आत्मविश्वास विरोधकांमध्ये बळावला असून आजच्या घडीला हे विरोधक हितेंद्र ठाकूर यांना घेरण्याची एकही संधी सोडत नाहीत. वसई- विरार शहर महानगरपालिकेच्या प्रत्येक महासभेत भाजप हा बहुजन विकास आघाडी व प्रशासकीय राजवटीतील गैरप्रकार चव्हाट्यावर आणत असल्यामुळे सत्ताधारी व प्रशासन भितीच्या सावटाखाली आले आहेत. अनधिकृत बांधकामे व आर्थिक घोटाळे, या अशा प्रकरणात हे दोघेही आकंठ बुडाले असल्याचे पावलोपावली दिसून येत आहे. दुसरीकडे बहुजन विकास आघाडीचे काही नगरसेवक दहशत व गुन्हेगारी…

Read More