- Home
- Uncategorized
- आंदोलन
- कृषी
- गुन्हेगारी
- चालू घडामोडी
- जागतिकीकरण
- राजकारण
- शैक्षणिक
- संपादकीय
- क्रीडा
- निवडणूक
- मनोरंजन
- विदेश
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
- केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे शिक्षण क्षेत्राची वाताहत,
- इराणने अमेरिकेचा नक्षा चांगलाच उतरवला,
- महिलांना डावलणे ; देवाभाऊंचे, ” गरज सरो आणि वैद्य मरो, ” धोरण,
- कॉक्रोच जनता पार्टीला सरकार व गोदी मिडिया, अशा दोन आघाड्यावर लढावे लागणार आहे,
- डोनाल्ड ट्रम्प ; … तर असा मित्र नसलेलाच बरा,
- पूर्वी कार्यकर्त्यांची ओळख ” पायपुसणी, ” अशी होती, आता ” अंधभक्त,” अशी झाली आहे…
- ममता बॅनर्जी यांचा उद्धव ठाकरे होणार…
- अपेक्षेप्रमाणे सेनेचे रविंद्र फाटक यांनी बाजी मारली,
Author: दीपक मोहिते
आम्हालाही शिकायचंय..! दीपक मोहिते, केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी १ एप्रिल २०१० रोजी शिक्षण अधिकार कायदा २००९,लागू केला.६ ते १४ वयोगटातील मुलाना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण देणे,असा उद्देश हा कायदा करण्यामागे होता.परंतु १० वर्षे उलटून गेल्यानंतरही या वयोगटातील लाखो मुले आज प्राथमिक शिक्षणापासून वंचित असल्याचे नुकत्याच झालेल्या एका पाहणीतून स्पष्ट झाले आहे. शाळाबाह्य असलेल्या प्रत्येक मुलाला शाळेत आणणे,टिकवणे,त्यास गुणवत्तापूर्वक शिक्षण देणे,व अन्य चांगले उद्देश डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा कायदा केला.परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी जी मानसिकता सरकारकडे असायला हवी होती,ती सरकारने आजवर दाखवली नाही.कायदा केला,परंतु तो कठोरपणे राबवला नाही.त्यामुळे आजही लाखो मुलांचे भवितव्य अंधारात चाचपडत आहे.अठरापगड दारिद्र असलेल्या लाखो कुटुंबातील ही…
वसई-विरार शहर महानगरपालिकेतर्फे गोविंदाना विम्याचे संरक्षण, पालघर, सालाबादप्रमाणे सामाजिक व धार्मिक उत्सव ” गोपाळकाला,” ( दहीहंडी ) मंगळ.२७ ऑगस्ट, २०२४ रोजी मनपा क्षेत्रात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे.तालुक्यातील अनेक गोविंदा पथके या उत्सवात मोठ्या उत्साहाने भाग घेत असतात.दहीहंडी उत्सवात भाग घेणारे गोविंदा पथक आपले उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करत असतात.उत्सवामधील जोखीम व धोका विचारात घेऊन गोविंदा पथकात भाग घेणाऱ्या गोविंदाना ( खेळाडू ) विम्याचे संरक्षण मिळावे,यासाठी वसई विरार शहर महानगरपालिकेने गोपाळकाला अपघात विमा योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेअंतर्गत दहीहंडी पथकातील सर्व गोविंदांचा मोफत अपघात विमा काढण्यात येतो.यंदाही तशी व्यवस्था करण्यात आली आहे.गोविंदा अपघात विमा योजनेचा अर्ज महानगरपालिकेच्या vvcmc.in…
पालघर, रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात नायगाव येथे रिक्षाचालकांचा रास्ता रोको, नुकत्याच झालेल्या मुसळधारवृष्टीत वसई तालुक्यातील अनेक रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे.” रस्त्यात खड्डे की खड्यात रस्ते,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात संबधित विभागाचे अधिकारी कोणत्याही उपाययोजना करत नसल्यामुळे आज नायगाव येथे रिक्षाचालकांनी रास्ता रोको आंदोलन केले. वसई तालुक्यात विरार,नालासोपारा,वसई व नायगाव,या शहरातील मुख्य रस्ते तसेच अंतर्गत असलेल्या रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले असून या सर्व रस्त्यावरून वाहतूक करणे, दिवसेंदिवस धोकादायक झाले आहे.अनेक भागात अपघात होऊनही रस्ते विकास,महानगरपालिका व सार्व.बांधकाम विभागाचे अधिकारी कोणतीही कार्यवाही करत नाहीत.त्यामुळे नागरिक व रिक्षाचालकामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.आज नायगाव येथे या असंतोषाचा स्फोट झाला.नायगाव-बाफाणे दरम्यान रस्त्याची पार दुर्दशा…
दीपक मोहिते, नवापूर दुर्घटना ; सातजण अटकेत तर अनेकांवर गुन्हे दाखल,प्रशासन अलर्ट मोडवर,गावात वातावरण तंग, काल नवापूर येथे घडलेल्या घटनेनंतर संबधित रिसॉर्टस जमीनदोस्त करण्यात आले आहे.पोलिसांनी मारहाण करणाऱ्या जमावातील तरुणांवर गुन्हे दाखल करणे सुरू केले आहे.काल रात्रभर झालेल्या तोडक कारवाईमुळे गावात तंग वातावरण निर्माण झाले होते.सरकारच्या या कारवाईच्या विरोधात महिलांनी प्रचंड आक्रोश सुरू ठेवला आहे. सेव्हन सी बीच या रिसॉर्टसवर झालेली तोडक कारवाई तब्बल १६ तास सुरू होती आणि ती पहाटे तीनच्या सुमारास आटोपली.या कारवाईमुळे रिसॉर्टसमालकाचे ५ कोटी रु.चे नुकसान झाले.तर या रिसॉर्टसमध्ये काम करणाऱ्या सुमारे १५० कुटुंबाचा रोजगार नाहीसा झाला आहे.सरकारने केलेली तोडक कारवाई चुकीची असून आम्ही महिला मुख्यमंत्र्यांच्या…
दीपक मोहिते, मुख्यमंत्र्यांनी इतर रिसॉर्टसवरही बुलडोझर चालवावा, काल विरार पश्चिमेस नवापूर समुद्रकिनारी फिरायला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी मिलिंद मोरे यांच्या पदाधिकाऱ्याला किरकोळ भांडणातून मारहाण झाली.या मारहाणीनंतर मोरे याना हृदयविकाराचा झटका आला व त्यांचा मृत्यू झाला.सदर घटनेची खबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लागताच त्यांनी स्थानिक पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले.त्यानुसार पोलिसांनी २० ते २५ जणावर गुन्हे दाखल केले व पोलीस आता रीतसर कारवाई करत आहेत. या सर्व घडामोडीनंतर अचानक घटनास्थळी अतिक्रमणविरोधी पथक दाखल झाले व त्यांनी ज्या रिसॉर्टससमोर हा प्रकार घडला,ते सेव्हन हिल्स रिसॉर्टस जमीनदोस्त केले.कारण मिलिंद मोरे याना मारहाण करणारे तरुण,या रिसॉर्टसचे कर्मचारी होते.मिलिंद मोरे यांचा मृत्यू हा…
दीपक मोहिते, ” हल्लाबोल,” मास्क व टोपीची एक सुरस कहाणी, नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसात पुणे शहराची अक्षरशः वाताहत झाली.हजारो नागरिकांचे संसार उघड्यावर पडले.तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.या प्रलयाला चार दिवस उलटल्यानंतरही अद्याप पुणे सावरलेले नाही.जिल्ह्याचे पालकमंत्री ” वराती मागून घोडे,” या म्हणीप्रमाणे आपले पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा लवाजमा सोबत घेऊन परिस्थितीची पाहणी करत आता फिरत आहेत.वास्तविक त्यांनी पावसाचा जोर लक्षात घेऊन नैसर्गिक आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवायला होती.तीन निष्पाप विद्यार्थ्यांचे बळी जाणे,हे पालकमंत्री म्हणून अजित पवार,खा.मुरलीधर मोहोळ,जिल्हाधिकारी व अन्य अधिकाऱ्याचे दारुण अपयश आहे,असं म्हंटल्यास ते वावगं ठरू नये.त्यामुळे या नैसर्गिक संकटात पुणेकरांचे जे हाल व त्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले,त्यास हीच मंडळी सर्वस्वी जबाबदार…
दीपक मोहिते, सूर्यातीर, अन्यथा जिल्हा नियोजन समित्यांच्या बैठका केवळ सोपस्कार ठरतील, दोन आठवड्यापूर्वी पालघर जिल्हा नियोजन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.मात्र विविध विभागाचे अधिकारी तयारी न करता आल्यामुळे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा पारा चढला व त्यांनी बैठकच तहकूब केली.मात्र या घटनेमुळे पालकमंत्र्यांचे प्रशासनावर अंकुश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील बैठकीचे इतिवृत्त देखील तयार करण्यात आले नव्हते.तर मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावाची अंमलबजावणी देखील झाली नव्हती.त्यामुळे पालकमंत्री संतापले व त्यांनी बैठक तहकूब केली.अशी पाळी पालकमंत्र्यांवर का आली ? याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.पालघर जिल्ह्याच्या निर्मितीला यंदा एक वर्ष पूर्ण होत आहे.पण जिल्ह्याने कात टाकली नाही.जिल्ह्याला मुबलक प्रमाणात आर्थिक निधी…
भाजप व शिवसेनेची ( एकनाथ शिंदे गट ) लगीनघाई सुरू झाली, पालघर, पालघर जिल्हा भाजपच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच एक बैठक पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.तर एकनाथ शिंदे यांनीही जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात आपल्या पदाधिकाऱ्यांवर विविध जबाबदाऱ्या सोपवल्या आहेत.या सर्व घडामोडी लक्षात घेता महायुतीमधील या दोन्ही घटकांनी निवडणुकीची लगबग सुरू केल्याचे दिसून आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे.या बैठकीस खा.डॉ.हेमंत सवरा,आ. निरंजन डावखरे,प्रभारी राणी द्विवेदी,अभिजीत पेडणेकर,जिल्हा अध्यक्ष महेंद्र पाटील व सर्व प्रमुख पदाधिकारी व अन्य ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी निवडणूक आखणी व अन्य बाबीवर आपली मते मांडली.तर पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी…
पालघर, नालासोपारा येथे आधुनिक काळातील लखोबा लोखंडे गजाआड, २५ हुन अधिक महिलांशी लग्न करून त्यांना लाखो रु.ना लुबाडणाऱ्या आधुनिक काळातील लखोबा लोखंडेला नालासोपारा पोलिसांनी गजाआड केले आहे. शादी डॉटकॉम या वेबसाईटवरून फिरोज नियाझ शेख हा इसम महिलांशी ओळख करून लग्न करायचा.नुकतेच त्याने नालासोपारा भागातील एका महिलेशी लग्न केले व त्या महिलेकडून लॅपटॉप व अन्य वस्तू विकत घेण्यासाठी साडेसहा लाख रु.उकळले.पण आपली फसवणूक झाल्याचे कळल्यानंतर त्या महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली.पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून फिरोझला ताब्यात घेतले.त्याची कसून चौकशी केली.या चौकशीत फिरोजने २५ हुन अधिक महिलांची अशीच फसवणूक केल्याचे उघडकीस आले.त्यामुळे पोलीस आता सर्व प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.फिरोज याने या महिलांना…
पालघर, अर्नाळा समुद्रात एका तरुणाचा बुडून मृत्यू, अर्नाळा समुद्रात तरुण प्रेमीयुगुलाने उडी टाकून आत्महत्या केली.सदर घटनेत मुलाचा बुडून मृत्यू झाला तर मुलीला स्थानिक ग्रामस्थानी वाचवले. दोन दिवसांपूर्वी विरार पश्चिमेस असलेल्या ग्लोबल सिटी या वसाहतीमध्ये राहणारे एक प्रेमीयुगुल तीन दिवसांपूर्वी घरातून पळून गेले होते.या प्रकरणी अर्नाळा पोलिसांकडे तक्रार करण्यात आल्यानंतर अर्नाळा पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन त्या दोघांना पोलीस ठाण्यात आणले होते.त्यांची चौकशी करण्यात येत असताना त्यांनी पोलिसांची नजर चुकवून पळ काढला व नजिकच्या समुद्रात उड्या मारल्या,अशी माहिती पोलीसांकडून देण्यात आली.सदर घटनेत मुलाचा बुडून मृत्यू झाला तर त्याच्या सोबत असलेल्या मुलीला स्थानिक ग्रामस्थांनी वाचवले.या घटनेने ग्लोबल सिटी या मध्यमवर्गीयांच्या नागरी वसाहतीवर…
